शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने 4 हजार कोटी खर्चूनही 'गंगा प्रदूषितच', RTI मधून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 19:14 IST

हिंदू भक्तांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी मोदी सरकारने 5523 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळात या नदीच्या स्वच्छतेसाठी

मुंबई - गंगा नदी स्वच्छ करण्याचा विडा मोदी सरकारने उचलला आहे. मात्र, मोदी सरकारमधील 4 वर्षांच्या कार्याकाळातही गंगा नदीचे शुद्धीकरण किंवा स्वच्छता करण्यात सरकारला अपयश आल्याचेच दिसून येत आहे. कारण, केंद्र सरकारने नमामी गंगे नावाने गंगा नदीच्या स्वच्छतेची योजना सुरू केली. 7 जुलै 2016 साली केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली. मात्र, सरकारने गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी 3867 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, गंगा नदीच्या स्वच्छतेत कुठलिही सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही.

हिंदू भक्तांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी मोदी सरकारने 5523 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळात या नदीच्या स्वच्छतेसाठी आत्तापर्यंत 3867 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या खर्चानंतरही नदीच्या स्वच्छतेत कुठलाही बदल झाल्याचे दिसत नाही. तसेच या नदीवरील जलप्रदुषणही कमी झाले नाही. द वायरने दिलेल्या वृत्तानुसार एका माहिती अधिकारातून ही माहिती पुढे आली आहे.नुकतेच गंगा नदीच्या शुद्धीकरण आणि स्वच्छतेसाठी 112 दिवसांच्या उपोषणानंतर स्वामी सानंद यांनी प्राणत्याग केला. पर्यावरणतज्ञ असलेल्या प्रा. जीडी अग्रवाल म्हणजेच स्वामी सानंद यांनी गंगा शुद्धीकरणासाठी आपले आयुष्य वेचले. तसेच मोदी सरकारने गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी काय केलं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मात्र, गंगा नदीच्या स्वच्छेतेसाठी दिलेल्या वचनाकडे भाजप सरकार का दुर्लक्ष करत आहे ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मोदी सरकार गंगा नदीच्या शुद्धीकरण आणि स्वच्छतेसाठी फेल ठरल्याचे नॅशनल ग्रीन ट्रीब्यूनलने (एनजीटी) जुलैमध्येच म्हटले होते. तसेच केंद्र सरकारने 7000 कोटी रुपये नेमकं कुठे खर्च केले ? असा सवालही एनजीटीने विचारला होता. सध्या नमामी गंगे योजनेंतर्गत 221 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 22,238 कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज काढण्यात आला आहे. मात्र, अद्याप केवळ 26 प्रकल्प पूर्ण झाले असून 67 प्रकल्पांना सुरुवात झाली आहे. तर नदीची तटबंदी आणि गंगा घाट स्वच्छेतेचे 24 ठिकाण पूर्ण झाले आहेत. दरम्यान, 2019 पर्यंत गंगा नदीच्या शुद्धीकरण आणि स्वच्छतेचे 70 टक्के काम पूर्ण होईल, असे नद्या विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते. 

टॅग्स :riverनदीNarendra Modiनरेंद्र मोदीenvironmentवातावरणRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता