शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याची मोदी सरकारची तयारी; पीएम किसान सन्मान निधी वाढवण्याची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 11:51 IST

यामध्ये प्रति शेतकरी कुटुंब दोन हजार ते तीन हजार रुपये वाढ करण्याची सरकारची योजना आहे. 

नवी दिल्ली. केंद्रातील मोदी सरकार येणाऱ्या दिवसांत शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याची तयारी करत आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, केंद्र सरकार पीएम किसान सन्मान सहायता निधी सहा हजार रुपयांवरून वाढवण्याचा विचार करत आहे. हा निधी ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात वाढीची मागणी होत होती. त्यामुळे आता यामध्ये प्रति शेतकरी कुटुंब दोन हजार ते तीन हजार रुपये वाढ करण्याची सरकारची योजना आहे. 

यासंदर्भातील प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. आता यावर अंतिम निर्णय पंतप्रधानांनी घ्यायचा आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान सहायता निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास सरकारी तिजोरीवर दरवर्षी २० ते ३० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडू शकतो. ही योजना शेतकऱ्यांसाठी कधीपर्यंत लागू होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

दरम्यान, या वर्षअखेर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणुकाही आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत केंद्र सरकार या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेणार की पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून हे पाऊल उचलले जाते, हे पाहावे लागणार आहे. यासोबतच, शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादनांची किमान आधारभूत किंमतीवर (एमएसपी) विक्री करावी, जेणेकरून त्यांच्या उत्पन्नाची पातळी वाढू शकेल, हेही सरकारला सुनिश्चित करायचे आहे.

काय आहे पीएम किसान सन्मान निधी योजना?पीएम किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. याअंतर्गत केंद्र सरकारकडून दर चार महिन्यांतून एकदा दोन हजार रुपये सहायता निधी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. एका शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. सध्या ही मदत रक्कम ८.५ कोटी शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचली आहे.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी