शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

'मोदी सरकारच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था रुळावरुन घसरली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 11:04 IST

2008 मधील मंदीच्या धक्क्यातून बाहेर आलेली भारतीय अर्थव्यवस्था मोदी सरकारच्या कार्यकाळात रुळावरुन घसरली असल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्दे2008 मधील मंदीच्या धक्क्यातून बाहेर आलेली भारतीय अर्थव्यवस्था मोदी सरकारच्या कार्यकाळात रुळावरुन घसरली असल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. 'ज्या लोकांनी अर्थव्यवस्था वर येईल असे विचार मांडले होते. ते लोक आता निराश होऊन सरकारला सोडून जात आहेत. ते खोटे आकडेवारी तयार करतात आणि त्यासाठी लोकांना भरीस पाडतात' 8 फेब्रुवारी रोजी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 2008 मधील मंदीच्या धक्क्यातून बाहेर आलेली भारतीय अर्थव्यवस्था मोदी सरकारच्या कार्यकाळात रुळावरुन घसरली असल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. 2008 मध्ये विकास दर हा 7.5 टक्के होता. 

'ज्या लोकांनी अर्थव्यवस्था वर येईल असे विचार मांडले होते. ते लोक आता निराश होऊन सरकारला सोडून जात आहेत. ते खोटे आकडेवारी तयार करतात आणि त्यासाठी लोकांना भरीस पाडतात' असा आरोप चिदंबरम यांनी केला आहे. 'अनडॉन्टेड: सेविंग द आयडिया ऑफ इंडिया' या पुस्तकात पी. चिदंबरम यांनी हे म्हटले आहे. 8 फेब्रुवारी रोजी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

'एक जुनी सभ्यता जी अनेक धर्म, संस्कृती, भाषा, समुदाय आणि जातींना जोडून ठेवली आहे. गेल्या 71 वर्षांदरम्यान आधुनिक राष्ट्र होण्याच्या दिशेने प्रयत्न केला. मात्र आज त्याचे इतके ध्रुवीकरण आणि विभाजन केले आहे की, त्यापासून आपल्या लोकांना वाचवणे हे चिंतेचे खरे कारण बनले आहे' असे चिदंबरम यांनी आपल्या पुस्तकाबाबत सांगताना म्हटले आहे. 

चिदंबरम यांनी काही दिवसांपूर्वी पीयूष गोयल यांनी केलेली नोकरभरतीची घोषणा म्हणजे 'आणखी एक जुमला' असल्याची टीका केली होती. पाच वर्ष शांत बसलेल्या या सरकारला अचानक रिक्तपदं भरण्यासाठी आता जाग आली, असा खोचक टोलादेखील चिदंबरम यांनी लगावला होता. तसेच चिदंबरम यांनी गुरुवारी (24 जानेवारी) मोदी सरकारवर ट्वीटरवरुन शाब्दिक हल्ला चढवला होता. ''रेल्वेमध्ये जवळपास पाच वर्षांपासून 2,82,976 पदं रिक्त आहेत. सरकार आता अचानक झोपेतून जागे झाले आहे. तीन महिन्यांमध्ये या रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. हा आणखी एक जुमला आहे, असे ट्वीट चिदंबरम यांनी केले होते. 

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाBJPभाजपाcongressकाँग्रेस