शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

फारुख अब्दुल्लांना पाठिंबा देत राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 10:14 IST

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे समर्थन केले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे समर्थन केले आहे. राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झालेली परिस्थिती यावरून मोदी सरकारवर टीका केली.'जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसाठी जागा निर्माण करणे सरकारने थांबवावे आणि नेत्यांना सोडून द्यावे'

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे समर्थन केले आहे. अब्दुल्ला यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यातंर्गत ताब्यात घेतल्यानंतर काही जण आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांनी फारुख अब्दुल्ला आणि जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झालेली परिस्थिती यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी 'जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसाठी जागा निर्माण करणे सरकारने थांबवावे आणि नेत्यांना सोडून द्यावे' असं ट्विट केलं आहे. तसेच 'सरकार फारुख अब्दुल्ला यांचं राजकीय स्थान संपवण्याचा प्रयत्न करत आहे, तसं झालं तर त्यांची जागा दहशतवादी घेतील. त्यानंतर मग काश्मीरचा वापर कायम भारताच्या इतर भागात राजकीय धृवीकरणासाठी केला जाईल' असं देखील राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना पब्लिक सेफ्टी अ‍ॅक्ट (पीएसए) अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, ज्या ठिकाणी फारुख अब्दुल्ला यांना ठेवण्यात येईल, त्याठिकाणी आदेशानुसार तात्पुरते घोषित करण्यात आले आहे. पीएसए कायद्यानुसार कोणत्याही संशयिताला कोणत्याही खटल्याशिवाय दोन वर्षे ताब्यात ठेवले जाऊ शकते. दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मीरमधील परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.  

एमडीएमकेचे नेते आणि राज्यसभा खासदार वायको यांनी फारुख अब्दुल्ला यांची मुक्तता करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी फारुख अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आल्याचे समोर आले. काश्मीरमध्ये मूलभूत अधिकारांचे हनन होत असून फारुख अब्दुल्ला यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले असल्याचे वायको यांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात सांगितले. याचिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला एका आठवड्यात उत्तर देण्याची नोटीस पाठविली आहे. मात्र, केंद्र सरकारने नोटीसची आवश्यकता नसून पुढील सुनावणीत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे.

हिंदी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जात असल्याने तीच देश एकसंध ठेवू शकते या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर देखील राहुल गांधी यांनी टीका केली आहे. राहुल यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधत म्हटले आहे की, भारतात हिंदीव्यतिरिक्त बोलल्या जाणाऱ्या प्रादेशिक भाषा हा दुबळेपणा नाही. तसेच अमित शहा यांच्या वक्तव्यावर द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, भाजपचे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा, असदुद्दीन ओवेसी, कमल हासन आदींनी टीका केली होती. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJammu Kashmirजम्मू-काश्मीरFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाcongressकाँग्रेसBJPभाजपा