शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने सर्व रेकॉर्ड मोडले; अवघ्या 15 दिवसात 5 जणांना जाहीर केला 'भारतरत्न' पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 15:09 IST

सरकारने 2 माजी पंतप्रधान, 1 माजी उप-पंतप्रधान, 1 माजी मुख्यमंत्री आणि एका कृषीतज्ञाला 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर केला आहे.

Bharat Ratna: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने 'भारतरत्न' (Bharatratna) पुरस्कार देण्याचा नवा विक्रम केला आहे. गेल्या 15 दिवसांत पाच मोठ्या व्यक्तींना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान मिळवणाऱ्यांमध्ये 2 माजी पंतप्रधान, 1 माजी उपपंतप्रधान, 1 मुख्यमंत्री तसेच प्रसिद्ध कृषी तज्ज्ञांचा समावेश आहे. यातील चौघांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येत आहे. या पाच नावांची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि स्वामीनाथन यांच्या भारतरत्नवर सोनिया गांधींची पहिली प्रतिक्रिया

केंद्र सरकारने आज देशाचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao), माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग (Chaudhary Charan Singh) आणि कृषीतज्ञ एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली. यापूर्वी केंद्र सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishn Advani) आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpuri Thakur) यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती.

1999 मध्ये अटल सरकारने 4 व्यक्तींना सन्मानित केलेविशेष म्हणजे, यापूर्वी एका वर्षात सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार 1999 मध्ये देण्यात आले होते. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने 4 मोठ्या व्यक्तींना हे सन्मान प्रदान केले होते. आता मोदी सरकारने तो रेकॉर्ड मोडित काढत पाच व्यक्तींना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. मोदी सरकारने भारतरत्न दिलेल्या व्यक्ती उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, आंध्र प्रदेश राज्यातील आहेत. अशाप्रकारे सरकारने उत्तर ते दक्षिण भारत कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे.

कधी झाली भारतरत्नची सुरुवातभारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे, जो राजकारण, कला, साहित्य, विज्ञान या क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवकाला दिला जातो. पण, 2013 मध्ये पहिल्यांदा खेळातील योगदानासाठी सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. 'भारतरत्न' पुरस्काराची सुरुवात तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 1954 रोजी केली होती. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण यांना 1954 मध्ये पहिल्यांदा हा सन्मान प्रदान करण्यात आला.

 

टॅग्स :Bharat Ratnaभारतरत्नCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीcongressकाँग्रेसBJPभाजपाBiharबिहारTamilnaduतामिळनाडूAndhra Pradeshआंध्र प्रदेश