शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रातील मोदी सरकार दलितविरोधी, राहुल गांधींची घणाघाती टीका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 15:00 IST

दलितांच्या प्रश्नावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

नवी दिल्ली - दलितांच्या प्रश्नावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे एससी एसटी विधेयकासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार हे दलित विरोधी असल्याचे सांगितले. देशभरात दलितांवर अत्याचार होत आहेत. देशात कुठेही दलित अत्याचाराविरोधात बोलावले जाईल, तिथे आपण जाऊ, असेही राहुल गांधी म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत सीताराम येचुरी हेसुद्धा उपस्थित होते.  जंतर मंतर येथे उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आणि धोरणे दलितविरोधी आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक पुस्तक लिहिले होते. त्यात त्यांनी दलितांना स्वच्छता करण्यामधून आनंद मिळतो असा दावा केला होता. जर  मोदींना दलितांचे दु:ख माहीत असते तर त्यांची धोरणे वेगळी असती." 

एससी एसटी कायदा कमकुवत करण्यासाठी मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांवी केला. "ज्या न्यायाधीशांनीं एससी एसटी कायद्यात बदल करून तो कमकुवत केला, त्या व्यायाधीशांना मोठे पद दिले, भारताच्या भविष्यात दलितांना कोणतेही स्थान असू नये असे मोदींना वाटते," असा आरोप त्यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी दलित संघटनांना आवाहनदेखील केले. "आपण सर्वांनी एकजूट होऊन भाजपा आणि संघाच्या विचारांना पराभूत करायचे आहे. त्यांचे विचार द्वेष पसरवणारे आहेत, तर काँग्रेस पक्ष प्रेमाने सर्वांना सोबत घेऊन चालणे जाणतो. 2019 मध्ये मोदी सरकारचा पराभव अटळ आहे आणि आपण सर्वांनी मिळून त्यांना पराभूत केले पाहिजे. तुम्ही देशात कुठेही आंदोलन केले तरी आम्ही तुमच्या सोबत राहू. मी तुमच्यासाठी नेहमीच उभा राहीन."असे राहुल गांधी म्हणाले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणDalit assaultदलितांना मारहाणnewsबातम्या