शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

केंद्रातील मोदी सरकार दलितविरोधी, राहुल गांधींची घणाघाती टीका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 15:00 IST

दलितांच्या प्रश्नावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

नवी दिल्ली - दलितांच्या प्रश्नावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे एससी एसटी विधेयकासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार हे दलित विरोधी असल्याचे सांगितले. देशभरात दलितांवर अत्याचार होत आहेत. देशात कुठेही दलित अत्याचाराविरोधात बोलावले जाईल, तिथे आपण जाऊ, असेही राहुल गांधी म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत सीताराम येचुरी हेसुद्धा उपस्थित होते.  जंतर मंतर येथे उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आणि धोरणे दलितविरोधी आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक पुस्तक लिहिले होते. त्यात त्यांनी दलितांना स्वच्छता करण्यामधून आनंद मिळतो असा दावा केला होता. जर  मोदींना दलितांचे दु:ख माहीत असते तर त्यांची धोरणे वेगळी असती." 

एससी एसटी कायदा कमकुवत करण्यासाठी मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांवी केला. "ज्या न्यायाधीशांनीं एससी एसटी कायद्यात बदल करून तो कमकुवत केला, त्या व्यायाधीशांना मोठे पद दिले, भारताच्या भविष्यात दलितांना कोणतेही स्थान असू नये असे मोदींना वाटते," असा आरोप त्यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी दलित संघटनांना आवाहनदेखील केले. "आपण सर्वांनी एकजूट होऊन भाजपा आणि संघाच्या विचारांना पराभूत करायचे आहे. त्यांचे विचार द्वेष पसरवणारे आहेत, तर काँग्रेस पक्ष प्रेमाने सर्वांना सोबत घेऊन चालणे जाणतो. 2019 मध्ये मोदी सरकारचा पराभव अटळ आहे आणि आपण सर्वांनी मिळून त्यांना पराभूत केले पाहिजे. तुम्ही देशात कुठेही आंदोलन केले तरी आम्ही तुमच्या सोबत राहू. मी तुमच्यासाठी नेहमीच उभा राहीन."असे राहुल गांधी म्हणाले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणDalit assaultदलितांना मारहाणnewsबातम्या