शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

'या' 4 महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या 4 वर्षांत सोडली मोदी सरकारची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 15:18 IST

मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी काल राजीनामा दिला

नवी दिल्ली: मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. सुब्रमण्यन वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं. सुब्रमण्यन यांच्या आधी तीन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी मोदी सरकारची साथ सोडली आहे. अरविंद सुब्रमण्यन: सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी बुधवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्य आर्थिक सल्लागार हे आपलं सर्वात आवडतं काम होतं आणि अरुण जेटली हे सर्वोत्तम बॉस होते, असं त्यांनी राजीनामा देताना म्हटलं. सुब्रमण्यन सप्टेंबरपर्यंत त्यांचं पद सोडणार आहेत. अरविंद पानगढिया: गेल्या वर्षी पानगढिया यांनी निती आयोगाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. कोलंबिया विद्यापीठातील अध्यापन पुन्हा सुरु करण्यासाठी राजीनामा देत असल्याचं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं. पानगढिया दीड वर्ष निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी होते. रघुराम राजन: जून 2016 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिलं होतं. सप्टेंबर महिन्यात कार्यकाळ संपल्यावर पुन्हा अध्यापनाकडे वळणार असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं होतं. राजन यांच्या राजीनाम्याची खूप चर्चा झाली होती. राजन यांना गव्हर्नरपदी राहण्याची इच्छा होती. मात्र सरकारची आर्थिक धोरणं पटत नसल्यानं त्यांनी पायउतार होणं पसंत केल्याचं वृत्त त्यावेळी अनेक वृत्तपत्रांनी दिलं होतं. विजयलक्ष्मी जोशी: स्वच्छ भारत अभियानाला एक वर्ष पूर्ण होण्याआधी जोशी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्याकडे या अभियानाचं प्रमुखपद होतं. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्या गुजरात केडरच्या आयएएस अधिकारी होत्या.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRaghuram Rajanरघुराम राजनReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNIti Ayogनिती आयोगBJPभाजपाArvind Subramanianअरविंद सुब्रमण्यनPoliticsराजकारण