शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'या' 4 महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या 4 वर्षांत सोडली मोदी सरकारची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 15:18 IST

मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी काल राजीनामा दिला

नवी दिल्ली: मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. सुब्रमण्यन वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं. सुब्रमण्यन यांच्या आधी तीन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी मोदी सरकारची साथ सोडली आहे. अरविंद सुब्रमण्यन: सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी बुधवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्य आर्थिक सल्लागार हे आपलं सर्वात आवडतं काम होतं आणि अरुण जेटली हे सर्वोत्तम बॉस होते, असं त्यांनी राजीनामा देताना म्हटलं. सुब्रमण्यन सप्टेंबरपर्यंत त्यांचं पद सोडणार आहेत. अरविंद पानगढिया: गेल्या वर्षी पानगढिया यांनी निती आयोगाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. कोलंबिया विद्यापीठातील अध्यापन पुन्हा सुरु करण्यासाठी राजीनामा देत असल्याचं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं. पानगढिया दीड वर्ष निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी होते. रघुराम राजन: जून 2016 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिलं होतं. सप्टेंबर महिन्यात कार्यकाळ संपल्यावर पुन्हा अध्यापनाकडे वळणार असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं होतं. राजन यांच्या राजीनाम्याची खूप चर्चा झाली होती. राजन यांना गव्हर्नरपदी राहण्याची इच्छा होती. मात्र सरकारची आर्थिक धोरणं पटत नसल्यानं त्यांनी पायउतार होणं पसंत केल्याचं वृत्त त्यावेळी अनेक वृत्तपत्रांनी दिलं होतं. विजयलक्ष्मी जोशी: स्वच्छ भारत अभियानाला एक वर्ष पूर्ण होण्याआधी जोशी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्याकडे या अभियानाचं प्रमुखपद होतं. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्या गुजरात केडरच्या आयएएस अधिकारी होत्या.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRaghuram Rajanरघुराम राजनReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNIti Ayogनिती आयोगBJPभाजपाArvind Subramanianअरविंद सुब्रमण्यनPoliticsराजकारण