शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

केसीआर यांच्या हिंदुत्वाला मोदी पराभूत करू शकत नाहीत- ओवैसी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 11:54 AM

हैदराबाद - एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी निवडणुकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखऱ ...

हैदराबाद - एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी निवडणुकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखऱ राव यांचा पराभव करू शकत नाही, कारण तेसुद्धा कट्टर हिंदुत्ववादी आहेत, असं ओवैसी म्हणाले आहेत. एका जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भाजपा म्हणते तेलंगणामध्ये लवकरच सरकार स्थापन करू, पण के चंद्रशेखऱ राव सुद्धा कट्टर हिंदू आहेत. जर मोदी दोन मंदिरात गेले, तर केसीआर 6 मंदिरात जातील, असंही ओवैसींनी सांगितलं आहे.  केसीआर यांचा पराभव करण्यासाठी भाजपा हिंदुत्वाचं कार्ड वापरू शकत नाही. आम्ही हिंदू धर्माच्या विरोधात नाही. परंतु हिंदुत्वाच्या विरोधात आहोत. यावेळी त्यांनी अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वींवरही निशाणा साधला आहे. नक्वींनी दरवर्षी एक कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचं आश्वासन दिलं होतं. मग केंद्रीय बजेटमध्ये शिष्यवृत्ती काही दिली नाही?, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.ओवैसींनी संघालाही लक्ष्य केलं आहे. इथे कथित स्वरूपात 'जय श्री राम' आणि 'वंदे मातरम' न म्हटल्यास मुस्लिमांना मारहाण केली जाते. लोकांना मारहाण केली जाते, कारण ते जय श्री राम आणि वंदे मातरमच्या घोषणा देत नाहीत. अशा घटना आता थांबणार नाहीत. फक्त मुसलमान आणि दलितांना टार्गेट केलं जातंय. अशा घटनांच्या मागे एक गट आहे आणि तो संघ परिवाराशी निगडित आहे.राजस्थानमध्ये दोन वर्षांपूर्वी मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू झालेल्या पहलू खानविरोधात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली. या प्रकरणावरून ओवैसी यांनी काँग्रेसलाही खडे बोल सुनावले आहेत. काँग्रेस नेहमीच दुटप्पी भूमिका घेत असते. जेव्हा पहलू खानवर हल्ला झाला, त्यावेळी काँग्रेसनं त्याचा निषेध नोंदवला होता. अशोक गेहलोत सरकारचं हे निधेषार्ह कार्य आहे. राजस्थानच्या मुस्लिमांना काँग्रेसनं नेहमीच दगा दिला आहे. त्यामुळे मुस्लिमांनी काँग्रेसवर विश्वास ठेवू नये. 

k-chandrashekar-rao-is-a-staunch-hindu-bjp-can-not-defeat-kcr-says-asaduddin-owaisi/

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीHindutvaहिंदुत्व