शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मोबाइल सेवा 6 फेब्रुवारी 2018ला होणार बंद, कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 11:00 IST

तुमच्या मोबाइल फोनची सेवा 6 फेब्रुवारी 2018 ला बंद होण्याची शक्यता आहे. का? असा प्रश्न तुम्हाला पडला आहे.

नवी दिल्ली - तुमच्या मोबाइल फोनची सेवा 6 फेब्रुवारी 2018 ला बंद होण्याची शक्यता आहे. का? असा प्रश्न तुम्हाला पडला आहे?. 6 फेब्रुवारीला मोबाइल सेवा खंडीत होऊ शकते कारण, 'जर तुम्ही अद्यापपर्यंत मोबाइल नंबर आधार कार्डसोबत लिंक केलेला नसेल तर लवकर लिंक करुन घ्यावा, अन्यथा तुमची मोबाइल सेवा बंद होऊ शकते', तुमचा मोबाइल क्रमांक अद्यापपर्यंत आधार कार्डसोबत जोडला गेलेला नसल्यास तुम्ही हा संदेश वारंवार ऐकत असाल किंवा वाचत तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळीच अलर्ट व्हा. या मेसेजकडे दुर्लक्ष केल्यास तुमची मोबाइल सेवा नक्कीच बंद होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकार आपल्या या योजनेसंदर्भात बरीच गंभीर असल्याचे दिसत आहे. गुरुवारी सुप्रीम कोर्टात यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले, ज्यामध्ये आता मोबाइलधारकांना 6 फेब्रुवारी 2018 पर्यंत आपला मोबाइल क्रमांक आधार कार्डसोबत जोडणं आवश्यक करण्यासंदर्भात उल्लेख आहे. या आदेशाला सुप्रीम कोर्टानं पारित करावं, या दिशेनं सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.  

केंद्र सरकारनं कोर्टात सांगितले की, सर्व मोबाइल क्रमांकांना ई-केव्हाईसी व्हेरिफिकेशन अंतर्गत आधार कार्डसोबत जोडणं आवश्यक आहे. शिवाय, नवीन बँक खाते सुरू करण्यासाठीही आधार कार्ड आवश्यक आहे. मोबाइल क्रमांक आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारकडून 6 फेब्रुवारी 2018 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सरकारी पक्षाचे वकील जोहेब हुसैन यांनी 113 पानांचं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले आहे. यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, सुप्रीम कोर्टानं 6 फेब्रुवारी 2017ला लोकनीती फाऊंडेशन प्रकरणाच्या सुनावणी वेळी सर्व मोबाइल क्रमांक एक वर्षाच्या आत आधार कार्डसोबत जोडण्याच्या सक्तीला मंजुरी दिली होती,असा संदर्भ यावेळी सरकारकडून देण्यात आला. मोबाइल क्रमांक आधारला लिंक करण्याची मुदत फक्त सरकारकडून बदलली जाऊ शकत नाही. कारण ही मुदत सुप्रीम कोर्टाकडून निश्चित करण्यात आली आहे, असेदेखील सरकारने  नमूद केले आहे.  

यासोबतच बँक खाते आधार कार्डला जोडण्याची मुदत 31 मार्चपर्यंत करण्यात आल्याचे सरकारने न्यायालयाला सांगितले. मोबाइल क्रमांक आधार कार्डला जोडण्याची सक्ती सरकारकडून केली जात असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी जनहित याचिकादेखील दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सरकारने दोन सदस्यीय खंडपीठाला चार आठवड्यांमध्ये उत्तर देण्याची सूचना केली होती. आधार कार्ड लिंक करणे म्हणजे खासगीपणाच्या हक्काचा (राइट टू प्रायव्हसी) भंग असल्याचा आक्षेप घेण्यात आलेल्या याचिकांवर घटनापीठाकडून सुनावणी घेण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे यावेळी सरकारनं असेही म्हटले आहे की, आधार कार्डची जोडणी न झाल्यानं देशात कुणाचाही भूकबळी गेलेला नाही. रेशन कार्ड आधार कार्डला न जोडल्याने धान्य नाकारण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये घडली होती. यामुळे १11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले.

 

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMobileमोबाइल