शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

गोहत्या रोखण्याचा प्रयत्न करणा-या महिलेवरच जमावाने केला हल्ला, विटा आणि काचेच्या बाटल्या मारल्या फेकून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 11:42 IST

अवैध गोहत्येची तक्रार केली म्हणून मारहाण करण्यात आल्याचा आरोप बंगळुरुतील एका महिलेने केला आहे. एनआयएने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने शहराबाहेरील तलघट्टापुरा परिसरात सुरु असलेल्या अवैध गोहत्येसंबंधी पोलिसांना माहिती दिली होती.

ठळक मुद्देअवैध गोहत्येची तक्रार केली म्हणून मारहाण करण्यात आल्याचा आरोप बंगळुरुतील एका महिलेने केला आहेमहिलेने शहराबाहेरील तलघट्टापुरा परिसरात सुरु असलेल्या अवैध गोहत्येसंबंधी पोलिसांना माहिती दिली होतीपोलिसांनी काहीतरी गडबड केल्याचा आरोप महिलेने केला आहे

बंगळुरु - अवैध गोहत्येची तक्रार केली म्हणून मारहाण करण्यात आल्याचा आरोप बंगळुरुतील एका महिलेने केला आहे. एनआयएने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने शहराबाहेरील तलघट्टापुरा परिसरात सुरु असलेल्या अवैध गोहत्येसंबंधी पोलिसांना माहिती दिली होती. नंदिनी असं या महिलेचं नाव असून, पोलिसांनी काहीतरी गडबड केल्याचा आरोप महिलेने केला आहे. नंदिनी यांनी सांगितलं आहे की, 'जेव्हा मी पोलिसांना यासंबंधी माहिती दिल्ली, तेव्हा त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण जेव्हा असं झालं नाही तेव्हा फसवणूक झाली असल्याचं माझ्या लक्षात आलं'. 

'जेव्हा आम्ही त्या परिसरात गेलो, तेव्हा तिथे बेकायदेशीरपणे गोहत्या सुरु असल्याचं दिसलं. तिथे 14 गायी बांधून ठेवण्यात आल्या होत्या, ज्यामधील दोन बछड्यांना कापण्यासाठी शेजारच्या रुममध्ये नेण्यात येत होतं. प्राण्यांवरील प्रेमामुळे आम्ही लगेचच तलघट्टापुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. कारवाई केली जात असून, पोलीस त्या पसिरात पोहोचले आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं', अशी माहिती नंदिनी यांनी दिली आहे.    

नंदिनी यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'जेव्हा आम्हाला कोणतीच अपडेट मिळाली नाही, तेव्हा आम्ही माझ्यासोबत असणा-या तक्रारदार सहकारी आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना घेऊन घटनास्थळी गेलो. ज्याप्रमाणे आम्हाला सांगण्यात आलं होतं, त्याप्रमाणे तिथे पोलिसांचा कडक बंदोबस्त असेल असं आम्हाला वाटलं होतं. पण तिथे कोणीच नव्हतं. आपण जाळ्यात अडकलो आहोत असं मला वाटू लागलं. जमावाने आमच्यावर विटा, काचेच्या बाटल्या फेकण्यास सुरुवात केली आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यास सुरुवात केली. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव होता'. जमावाने केलेल्या दगडफेकीत नंदिनी यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून, प्रचंड नुकसान झालं.  

'आम्ही जिवंत बाहेर पडू असं मला वाटलंच नव्हतं. काही मिनिटात 150 ते 200 लोक जमा झाले आणि आमच्यावर हल्ला सुरु केली. आम्हाला वाचवण्यासाठी तिथे पोलीसही उपस्थित नव्हते. अशा प्रकारे फक्त गुन्हेगारच वागू शकतात. माफिया इतक्या कमी वेळात एवढी लोक जमा करु शकत नाहीत. यामध्ये पोलीसदेखील सामील असल्याची माझी खात्री आहे. जर पोलिसांनी कर्तव्य बजावलं असतं, तर एका महिलेला एवढा धोका पत्करावा लागला नसता', असं नंदिनी यांनी सांगितलं आहे. 

माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपला निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्यावर टीका केली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस