शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

'फुकटचा पैसा कोणी देत असेल तर घ्या'; मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस आमदारांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 12:49 IST

Congress: मध्य प्रदेश विधानसभेच्या 230 सदस्यांमध्ये कॉंग्रेसचे 114 आमदार आहेत तर भाजपाकडे 104 आमदार आहेत.

ठळक मुद्देराज्यसभेच्या एका जागेसाठी 58 मते आवश्यक मध्य प्रदेश विधानसभेच्या 230 सदस्यांमध्ये कॉंग्रेसचे 114 आमदार आहेत.2018 मध्येही भाजपाने काही कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला

भोपाळ - मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपावर आरोप लावला होता. सरकार बनवण्यासाठी काँग्रेस आमदारांना पैसे देऊन घोडेबाजार करण्यात येत आहे. एका आमदाराला २५-३५ कोटी रुपये देण्यात येत आहेत, याचे पुरावेही माझ्याकडे आहे असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केलं होतं. 

दिग्विजय सिंह यांच्या आरोपावर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांना जर फुकटचा पैसा मिळत असेल तर त्यांनी घ्यावा असं विधान त्यांनी केलं आहे. आमदारांनी मला सांगितलं आम्हाला इतके पैसे देण्याची ऑफर देत आहेत. मी आमदारांना फुकटचे पैसे मिळत असतील तर घ्यायला हवे असं सांगितलं आहे अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. 

2018 मध्येही भाजपाने सरकार स्थापण्यासाठी काही कॉंग्रेसचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कॉंग्रेसच्या आमदारांनी त्यांची कल्पना नाकारल्याने मोहीम फोल ठरली. तसेच, शिवराजसिंह चौहान आणि नरोत्तम मिश्रा यांच्यात मुख्यमंत्री होण्यासाठी मतभेद होते. मात्र आता त्यांनी एकमत केलं असून जर त्यांना राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ मिळालं तर चौहान यांना मुख्यमंत्री केले जाईल आणि मिश्रा यांना उपमुख्यमंत्री बनतील असं ठरलं आहे असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. तसेच पाच ते सात आमदारांना भाजपा नेत्यांचे फोन आले आहेत. ज्यामध्ये त्याला पहिला हप्ता म्हणून पाच कोटी रुपये आणि राज्यसभा निवडणुकीनंतर उर्वरित पैसे देवू असं सांगण्यात आलं आहे. 

मध्य प्रदेश विधानसभेच्या 230 सदस्यांमध्ये कॉंग्रेसचे 114 आमदार आहेत. त्यांच्याकडे चार अपक्ष आमदार, बसपाचे दोन आमदार आणि सपाच्या एका आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपाकडे 104 आमदार आहेत. या महिन्यात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणुका होणार आहेत. भाजपाकडे सध्या तीन पैकी दोन जागा आहेत.

राज्यसभेच्या एका जागेसाठी 58 मते आवश्यक राज्यसभेच्या एका जागेसाठी कोणत्याही पक्षाला 58 मतांची आवश्यकता आहे. एक जागा भाजपा आणि कॉंग्रेस सहजतेने जिंकू शकतात. त्याचबरोबर तिसर्‍या जागेसाठी भाजपाकडे 49 आणि कॉंग्रेसकडे 56 मते आहेत. ज्यामुळे अपक्ष आणि दोन्ही पक्षांची मते अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाDigvijaya Singhदिग्विजय सिंह