शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

बिहारमध्ये मोठी उलथा पालथ होणार? बहुमत चाचणीत २०० सदस्यांचा RJD ला पाठिंबा, आमदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 10:49 IST

तेजस्वी यादव यांना २०० आमदार समर्थन देऊ शकतात असा दावा केला आहे.

बिहारसाठी उद्याचा दिवस महत्वाचा आहे. उद्या बिहार विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. यामुळे आता बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय पेच वाढला आहे. सर्वच पक्षांनी आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बिहारमध्ये गेल्या काही दिवसापासून उलथापालथ सुरू आहे, काही दिवसापूर्वीच नितीश कुमार यांनी एनडीएसोबत जात सरकार स्थापन केले, आता  या सरकारची उद्या सोमवारी बहुमत चाचणी होणार असून याचे  चित्र २४ तासांत स्पष्ट होईल.

बहुमत चाचणीपूर्वी RJD आपल्या आमदारांवर लक्ष ठेवून आहे. यासाठी तेजस्वी यादव यांनी सर्व आमदारांना त्यांच्या घरी ठेवले आहे. सर्व आमदार त्यांच्या निवासस्थानी मुक्कामी आहेत. दरम्यान, आरजेडी आमदार अख्तरुल इस्लाम शाहीन यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.ख्तरुल इस्लाम शाहीन म्हणाले की, जर व्हिप जारी केला नाही तर २०० आमदार तेजस्वी यादव यांच्या समर्थनार्थ उभे राहतील', असं वक्तव्य त्यांनी केले.

भाजपा देशातील सर्वांत श्रीमंत पक्ष, इलेक्टोरल बॉन्डमधून मिळाले 1300 कोटी, तर काँग्रेसला... 

आमदार अख्तरुल इस्लाम म्हणाले की, फक्त आरजेडीच नाही तर जेडीयू आणि भाजपच्या आमदारांचाही तेजस्वी यादव यांच्यावर विश्वास आहे. तेजस्वी यादव यांच्यावर आमदारांचे आकर्षण आहे असा विश्वास आहे. जर व्हिप जारी केला नाही तर २४३ सदस्यांच्या सभागृहात २०० आमदार तेजस्वी यादव यांना पाठिंबा देतील. ते लोक तेजस्वी यादव यांना ओळखतात आणि त्यांचे काम पाहिले आहे.

रविवारी RJD आमदार आणि महाआघाडीच्या आमदारांची बैठक झाली. त्यानंतर सर्व आमदारांना तेजस्वी यांच्या निवासस्थानी थांबवण्यात आले. फ्लोअर टेस्ट होईपर्यंत सर्व ७९ आमदार त्यांच्या निवासस्थानी राहतील. या काळात आमदारांना फोन न वापरण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त आहे.

काँग्रेसचे १७ आमदार हैदराबादमध्ये आहेत, तर भाजपचे आमदार बोधगयामध्ये आहेत. फ्लोअर टेस्टपूर्वी सर्वच पक्ष चिंतेत असल्याने सर्वच पक्ष आमदारांना वाचवण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, जनता दल युनायटेड आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाने त्यांच्या आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांना एनडीएच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले आहे.

बहुमतासाठी १२२ आमदारांचा पाठिंबा 

१७ महिने एकत्र राहिल्यानंतर नितीश कुमार महाआघाडी सोडून पुन्हा एकदा एनडीएमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर २८ जानेवारीला नितीश कुमार यांनी बिहारचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा १२२ आहे. सरकार स्थापन करण्यासाठी १२२ आमदारांचा पाठिंबा लागणार आहे.

नितीश कुमार यांनी १२८ आमदारांच्या पाठिंब्याची चर्चा केली आहे. त्यांच्याकडे बहुमतापेक्षा फक्त ६ आमदार जास्त आहेत, तर महाआघाडीकडे ११५ आमदार आहेत, त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी ७ आमदारांची गरज आहे. आता सारा खेळ या सात आमदारांवर अवलंबून आहे जे राज्यात मोठा बदल घडवू शकतात.

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार