शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
15
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
16
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
17
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
18
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
19
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
20
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली

बिहारमध्ये मोठी उलथा पालथ होणार? बहुमत चाचणीत २०० सदस्यांचा RJD ला पाठिंबा, आमदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 10:49 IST

तेजस्वी यादव यांना २०० आमदार समर्थन देऊ शकतात असा दावा केला आहे.

बिहारसाठी उद्याचा दिवस महत्वाचा आहे. उद्या बिहार विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. यामुळे आता बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय पेच वाढला आहे. सर्वच पक्षांनी आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बिहारमध्ये गेल्या काही दिवसापासून उलथापालथ सुरू आहे, काही दिवसापूर्वीच नितीश कुमार यांनी एनडीएसोबत जात सरकार स्थापन केले, आता  या सरकारची उद्या सोमवारी बहुमत चाचणी होणार असून याचे  चित्र २४ तासांत स्पष्ट होईल.

बहुमत चाचणीपूर्वी RJD आपल्या आमदारांवर लक्ष ठेवून आहे. यासाठी तेजस्वी यादव यांनी सर्व आमदारांना त्यांच्या घरी ठेवले आहे. सर्व आमदार त्यांच्या निवासस्थानी मुक्कामी आहेत. दरम्यान, आरजेडी आमदार अख्तरुल इस्लाम शाहीन यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.ख्तरुल इस्लाम शाहीन म्हणाले की, जर व्हिप जारी केला नाही तर २०० आमदार तेजस्वी यादव यांच्या समर्थनार्थ उभे राहतील', असं वक्तव्य त्यांनी केले.

भाजपा देशातील सर्वांत श्रीमंत पक्ष, इलेक्टोरल बॉन्डमधून मिळाले 1300 कोटी, तर काँग्रेसला... 

आमदार अख्तरुल इस्लाम म्हणाले की, फक्त आरजेडीच नाही तर जेडीयू आणि भाजपच्या आमदारांचाही तेजस्वी यादव यांच्यावर विश्वास आहे. तेजस्वी यादव यांच्यावर आमदारांचे आकर्षण आहे असा विश्वास आहे. जर व्हिप जारी केला नाही तर २४३ सदस्यांच्या सभागृहात २०० आमदार तेजस्वी यादव यांना पाठिंबा देतील. ते लोक तेजस्वी यादव यांना ओळखतात आणि त्यांचे काम पाहिले आहे.

रविवारी RJD आमदार आणि महाआघाडीच्या आमदारांची बैठक झाली. त्यानंतर सर्व आमदारांना तेजस्वी यांच्या निवासस्थानी थांबवण्यात आले. फ्लोअर टेस्ट होईपर्यंत सर्व ७९ आमदार त्यांच्या निवासस्थानी राहतील. या काळात आमदारांना फोन न वापरण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त आहे.

काँग्रेसचे १७ आमदार हैदराबादमध्ये आहेत, तर भाजपचे आमदार बोधगयामध्ये आहेत. फ्लोअर टेस्टपूर्वी सर्वच पक्ष चिंतेत असल्याने सर्वच पक्ष आमदारांना वाचवण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, जनता दल युनायटेड आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाने त्यांच्या आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांना एनडीएच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले आहे.

बहुमतासाठी १२२ आमदारांचा पाठिंबा 

१७ महिने एकत्र राहिल्यानंतर नितीश कुमार महाआघाडी सोडून पुन्हा एकदा एनडीएमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर २८ जानेवारीला नितीश कुमार यांनी बिहारचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा १२२ आहे. सरकार स्थापन करण्यासाठी १२२ आमदारांचा पाठिंबा लागणार आहे.

नितीश कुमार यांनी १२८ आमदारांच्या पाठिंब्याची चर्चा केली आहे. त्यांच्याकडे बहुमतापेक्षा फक्त ६ आमदार जास्त आहेत, तर महाआघाडीकडे ११५ आमदार आहेत, त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी ७ आमदारांची गरज आहे. आता सारा खेळ या सात आमदारांवर अवलंबून आहे जे राज्यात मोठा बदल घडवू शकतात.

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार