शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी मान्य न करणं ही चूक; भाजपा खासदाराची कबुली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 19:46 IST

सुब्रम्हण्यम स्वामी हे अनेकदा भाजपाविरोधात भूमिका घेण्यासाठीही ओळखले जातात.

नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाचा फटका शिवसेना-भाजपा युतीला बसला. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना युतीत तणाव निर्माण झाला त्यामुळे राज्यात भाजपाला सत्ता गमवावी लागली. महाराष्ट्रासारखं राज्य भाजपाच्या हातून निसटलं. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सत्ता आणली. मात्र शिवसेनेला मुख्यमंत्रिपद न देणं ही भाजपाची चूक होती अशी कबुली भाजपाचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी दिली आहे. 

न्यूज १८ इंडियाच्या कार्यक्रमात बोलताना सुब्रम्हण्यम स्वामी म्हणाले की, शिवसेना हा भाजपाचा सर्वात जुना मित्रपक्ष आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र होतो. शिवसेनेला दूर करणे योग्य झालं नाही. जुन्या मित्रपक्षाला टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायला हवं होतं. मात्र तसं झालं नाही. शिवसेनेने आमची साथ सोडली असं त्यांनी बोलून दाखविले. 

सुब्रम्हण्यम स्वामी हे अनेकदा भाजपाविरोधात भूमिका घेण्यासाठीही ओळखले जातात. मागील आठवड्यात त्यांनी घसरलेल्या अर्थव्यवस्थेवरुन भाजपा सरकारला घरचा आहेर दिला होता. अर्थव्यवस्थेला रुळावर आणता आले नाही, तर राम मंदिराचा विजयही पक्षाला तारू शकणार नाही, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले होते. 

'हफपोस्ट इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सुब्रमण्यम स्वामींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. भाजपा खासदारानं पक्षालाचा इशारा देत सांगितलं होतं की, देशातली आर्थिक स्थिती एवढी वाईट आहे की त्याचा फटका भाजपाला दिल्ली आणि झारखंडच्या निवडणुकीत बसणार आहे. अर्थव्यवस्थेला योग्य मार्गावर आणण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे. मोदींच्या परदेश दौऱ्यावर निशाणा साधत ते म्हणाले, याचा फायदा दिसत नाही. झारखंडमध्ये सरयू राय यांच्यावर कारवाई करण्यात आली, खरं तर प्रामाणिकपणा पाहता त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे. अयोध्या निर्णयाचा लाभ भाजपाला वाईट अर्थव्यवस्थेमुळे मिळणार आहे?, राम मंदिर बनणार असल्यानं मिठाई वाटप केलं जात आहे. त्यासाठी रॅलींचं आयोजनही केलं जात आहे. एक व्यक्ती स्वतःच्या मुलीची फीसुद्धा भरू शकत नाही. चांगल्या धोरणांनी वाईट परिस्थिती बदलता येऊ शकते अशी टीका त्यांनी केली होती.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री