शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मिशन 2024; NDA उमेदवारांची कठोर परीक्षा, सर्वेक्षणातून निवडला जाणार लोकसभेचा उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 17:06 IST

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी एक वेगळीच रणनीती आखली आहे. यानुसार सर्वेक्षणातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे. यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजप विविध पक्षांना राष्ट्रीय लोकशाही(NDA) मध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच भाजपने आपल्या उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाजपच्या सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी एनडीएच्या उमेदवारांना भाजपच्या कठोर निवड प्रक्रियेतून आणि निकषांमधून जावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला कोणतीही जोखीम पत्करायची नाही, त्यामुळे यावेळेस लोकसभा मतदारसंघनिहाय अभिप्राय घेऊन उमेदवार शोधण्यासाठी सर्वेक्षण केले जाणारआहे.

25 वर्षांपूर्वी एनडीएची युती झाल्यापासून भाजपने आपल्या मित्रपक्षांना उमेदवार निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळापासून ते नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळापर्यंत 2014 आणि 2019 मध्ये एनडीएतील घटक पक्षांनी त्या-त्या जागांबाबत भाजपशीच चर्चा केली आणि जागा मिळाल्यानंतर उमेदवार निवडले. अनेक ठिकाणी याचा उलट परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी प्रत्येक जागा भाजपसाठी महत्त्वाची असल्याने भाजप स्वतः त्या उमेदवाराची चाचपणी करणार आहे. लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या आपल्या घटक पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची नावे मागवणार असून विजयाच्या शक्यतेनुसार निर्णय घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. देशातील सर्व 543 जागांवर भाजपचे सर्वेक्षण आणि फीडबॅकचे काम सातत्याने सुरू आहे. ज्या जागेवर मित्रपक्षाचे उमेदवार असतील, तिथे त्याची योग्यता, निवडून येण्याची शक्यता, अशा सर्व बाबी तपासल्या जाणार आहेत.

जागा वाटपावरुन मित्रपक्षांमध्ये वाद झाला, तर भाजप तो वाद सोडवण्यात मदत करेल आणि अंतिम निर्णय भाजपचा असेल. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने आपल्या सर्व मित्रपक्षांना जागा देण्याची गरज नसल्याचेही म्हटले आहे. ज्या मित्रपक्षांचा राज्यांमध्ये प्रभाव आहे आणि जे विजयी समीकरणात बसतील त्यांनाच भाजप जागा देईल आणि उर्वरित मित्रपक्षांना राज्यांच्या निवडणुकीत जागा देण्याचे आश्वासन देऊन त्यांचे समाधान करेल.

टॅग्स :lok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक