शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

बेपत्ता पोलीस भोगतोय तिहारमध्ये जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 05:11 IST

महिनाभराच्या रजेनंतरही कामावर रुजू न होऊन बेपत्ता असलेला पोलीस अधिकारी हा गाजलेल्या हत्याकांडातील दोषी असून, सध्या तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे हे समजायला पोलिसांनाच तब्बल पाच महिने लागले.

मेरठ/बिजनोर -  महिनाभराच्या रजेनंतरही कामावर रुजू न होऊन बेपत्ता असलेला पोलीस अधिकारी हा गाजलेल्या हत्याकांडातील दोषी असून, सध्या तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे हे समजायला पोलिसांनाच तब्बल पाच महिने लागले.कंवरपाल सिंह (५५) असे त्याचे नाव आहे. त्याची शेवटची नियुक्ती ही बिजनोर बधापूर पोलीस ठाण्यात होती. १५ नोव्हेंबर रोजी सिंह महिनाभराच्या रजेवर गेला. तो उत्तर प्रदेश प्रॉव्हिन्शियल आर्मड् कॉन्स्टॅब्युलरचा (पीएसी) माजी कर्मचारी. २२ मे १९८७ रोजी मेरठच्या हाशीमपुरा भागात ४२ मुस्लिम पुरुषांच्या झालेल्या हत्याकांडात त्याच्यासह १५ जणांना दिल्ली उच्च न्यायालयाने दोषी ठरवून आजन्म तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. ४२ मुस्लिमांना गोळ्या घालून ठार मारून मेरठच्या कालव्यात फेकून देण्यात आले होते. १९ पीएसी जवानांना (त्यातील तिघांचा ३१ वर्षे चाललेल्या खटल्यात मृत्यू झाला) खालच्या न्यायालयाने निर्दोष ठरविले होते. हा निर्णय न्यायमूर्ती एस. मुरलीधर आणि विनोद गोयल यांनी फिरविला व ते ठरवून केले गेलेले मुस्लिमांचे हत्याकांड होते, असे म्हटले. (वृत्तसंस्था)न्यायमूर्तींनी दोषी ठरलेल्यांच्या शिक्षेबद्दल करण्यात आलेल्या युक्तिवादाला प्रतिसाद न देता त्यांना आयुष्याच्या शेवटपर्यंत तुरुंगात ठेवण्याची शिक्षा सुनावली.३१ आॅक्टोबर, २०१८ रोजीच्या आपल्या निर्णयात उच्च न्यायालयाने दोषींना २२ नोव्हेंबरपर्यंत शरण येण्याचा आदेश दिला होता. ही मुदत कंवरपाल सिंह रजेवर जाण्याच्या नेमका एक आठवडा आधीची होती. साडेतीन महिन्यांनंतरही सिंह कामावर रुजू झाला नाही व सेवेचा भंग केला म्हणून बिजनोर पोलिसांनी त्याला १ एप्रिल, २०१९ रोजी निलंबित केले. तो हत्याकांडात दोषी ठरला आहे, याची बिजनोर पोलिसांना काही माहितीच नव्हती. त्याचा ठावठिकाणा शोधण्यात आला. त्या अहवालावरून बिजनोरच्या पोलीस अधीक्षकांनी त्याला गेल्या आठवड्यात सेवेतून बडतर्फ केले. 

टॅग्स :jailतुरुंगPoliceपोलिस