शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचे गैरवर्तन, नायडूंच्या डोळ्यांत अश्रू; संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 15:24 IST

नव्या कृषी कायद्यांवर राज्यसभेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच लावून धरली होती.

हरिश गुप्ता -

नवी दिल्ली : राज्यसभेत विरोधी पक्षांतील काही सदस्यांनी केलेल्या गैरवर्तन व गदारोळाबद्दल सभापती व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी तीव्र संताप व्यक्त केला. त्यावेळी नायडू खूप भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळून ते काही सेकंद बोलू शकले नाहीत. राज्यसभेतील सदस्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे अस्वस्थ होऊन मी रात्रभर झोपू शकलो नाही असेही ते म्हणाले. विरोधकांच्या गदारोळाबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्ट रोजी संपणार होते. नव्या कृषी कायद्यांवर राज्यसभेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच लावून धरली होती. मात्र त्याऐवजी कृषीविषयक समस्या व उपाययोजना या विषयावर चर्चा करण्यास मंगळवारी संमती देण्यात आली. या निर्णयाचा निषेध करताना काही विरोधी सदस्य राज्यसभेत जिथे पत्रकार, अधिकारी बसतात, त्या टेबलांवर चढून घोषणा देऊ लागले. एका खासदाराने कामकाजातील एक फाईल सभापतींच्या दिशेने भिरकावली होती. राज्यसभेचे बुधवारी कामकाज सुरू होताच सभापती व्यंकय्या नायडू म्हणाले की, सभापतींचे आसन व त्याजवळील भाग हा एक प्रकारे राज्यसभेचा गाभारा आहे. त्यासहित सर्व सभागृहाचे पावित्र्य खासदारांनी कायम राखले पाहिजे. 

अपेक्षेइतके काम नाहीलोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत जितके काम होणे अपेक्षित होते तितके होताना दिसत नाही. या अधिवेशनात काळात आतापर्यंत या सभागृहाचे फक्त २२ तासच काम झाले आहे. विरोधकांच्या गदारोळाचे कारण देऊन लोकसभेचे कामकाज ओम बिर्ला यांनी अनिश्चित काळासाठी तहकूब केले.  

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस