शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

विरोधकांचे गैरवर्तन, नायडूंच्या डोळ्यांत अश्रू; संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 15:24 IST

नव्या कृषी कायद्यांवर राज्यसभेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच लावून धरली होती.

हरिश गुप्ता -

नवी दिल्ली : राज्यसभेत विरोधी पक्षांतील काही सदस्यांनी केलेल्या गैरवर्तन व गदारोळाबद्दल सभापती व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी तीव्र संताप व्यक्त केला. त्यावेळी नायडू खूप भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळून ते काही सेकंद बोलू शकले नाहीत. राज्यसभेतील सदस्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे अस्वस्थ होऊन मी रात्रभर झोपू शकलो नाही असेही ते म्हणाले. विरोधकांच्या गदारोळाबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्ट रोजी संपणार होते. नव्या कृषी कायद्यांवर राज्यसभेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच लावून धरली होती. मात्र त्याऐवजी कृषीविषयक समस्या व उपाययोजना या विषयावर चर्चा करण्यास मंगळवारी संमती देण्यात आली. या निर्णयाचा निषेध करताना काही विरोधी सदस्य राज्यसभेत जिथे पत्रकार, अधिकारी बसतात, त्या टेबलांवर चढून घोषणा देऊ लागले. एका खासदाराने कामकाजातील एक फाईल सभापतींच्या दिशेने भिरकावली होती. राज्यसभेचे बुधवारी कामकाज सुरू होताच सभापती व्यंकय्या नायडू म्हणाले की, सभापतींचे आसन व त्याजवळील भाग हा एक प्रकारे राज्यसभेचा गाभारा आहे. त्यासहित सर्व सभागृहाचे पावित्र्य खासदारांनी कायम राखले पाहिजे. 

अपेक्षेइतके काम नाहीलोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत जितके काम होणे अपेक्षित होते तितके होताना दिसत नाही. या अधिवेशनात काळात आतापर्यंत या सभागृहाचे फक्त २२ तासच काम झाले आहे. विरोधकांच्या गदारोळाचे कारण देऊन लोकसभेचे कामकाज ओम बिर्ला यांनी अनिश्चित काळासाठी तहकूब केले.  

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस