शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील बड्या नेत्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 16:52 IST

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि काँग्रेसचे संबंध ताणल्याने राज्यात दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लोकसभा निवडणूक लढवली. मात्र तिथे काँग्रेसला फारशी कामगिरी करता आली नसल्याने पक्षांतर्गत कुरघोडीचं राजकारण सुरु झाले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खुली ऑफर दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये हरल्यामुळे पक्षाकडून अधीर रंजन चौधरींना दुर्लक्षित आणि अपमानित केले जात आहे. काँग्रेसच्या या वागणुकीमुळे अनेक लोक भाजपात सहभागी झालेत. जर अधीर रंजन चौधरी यांचा काँग्रेसमध्ये अपमान होत असेल तर त्यांनी काँग्रेस सोडावी, त्यांनी एनडीए किंवा माझ्या RPI पक्षात यावं असं आमंत्रण मी देतो असं सांगत रामदास आठवलेंनी चौधरींना ऑफर दिली आहे.

अधीर रंजन चौधरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर निशाणा साधलाय. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ज्यादिवसापासून मल्लिकार्जुन खरगे पक्षाचे अध्यक्ष बनलेत. त्यादिवसापासून पक्षाच्या घटनेनुसार सर्व पदे अस्थायी झालीत. माझेही पद अस्थायी झालं आहे. मी निवडणुकीत पक्षाच्या नेत्यांसमोर माझं मत मांडले तेव्हा आवश्यकता भासल्यास मला बाहेर ठेवले जाईल असं मल्लिकार्जुन खरगे टीव्हीसमोर म्हणाले. खरगेंच्या या विधानाने मला दु:ख झाले. पश्चिम बंगालमध्ये निकाल काँग्रेससाठी चांगले राहिले नाहीत. राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत मी माझं पद दुसऱ्याला दिलं जावं असं खरगेंना सांगितलं होतं असं चौधरींनी खुलासा केला.

त्याशिवाय AICC ने पश्चिम बंगालच्या काँग्रेस नेत्यांची बैठक बोलवण्याची माहिती मला दिली. २ महत्त्वाचे प्रस्ताव पास करायचे आहेत असं सांगितले. ही बैठक माझ्या अध्यक्षतेखाली बोलावली गेली. बैठकीच्या वेळी मी पश्चिम बंगाल काँग्रेसचा अध्यक्ष होतो, मात्र बैठकीत गुलाम अली मीर यांनी माझा उल्लेख करत राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष असं म्हटलं तेव्हा मी आता राज्याचा प्रदेशाध्यक्ष नाही हे कळालं असल्याचं अधीर रंजन चौधरींनी सांगितले.

गुलाम अली मीर यांनी दिलं स्पष्टीकरण

राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे संबंध आणि विविध मुद्द्यांवर बैठक आयोजित केली होती. वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली. अधीर रंजन चौधरीही बैठकीला होते. तेव्हा सर्वांना माहिती व्हावं यासाठी मी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीनंतर अधीर रंजन यांनी राजीनामा दिला आहे, २०२६ च्या विधानसभा निवडणुकीवर आपले विचार ठेवायला हवेत. चौधरी यांनी राजीनामा दिला त्यामुळे तेव्हापासून ते माजी प्रदेशाध्यक्ष झालेत असं काँग्रेस नेते गुलाम अली मीर यांनी सांगितले. तसेच त्यांचा राजीनामा स्वीकारला की नाही याची पुष्टी केवळ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे कार्यालय करू शकते असेही त्यांनी म्हटलं.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेcongressकाँग्रेसwest bengalपश्चिम बंगालMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी