शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

India Taliban Talks: अफगाणिस्तानमधील स्थितीवर सर्वपक्षीय बैठक; तालिबानी हालचालींवर भारताची भूमिका ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 13:07 IST

विविध राजकीय पक्षांच्या सभागृहातील नेत्यांना अफगाणिस्तानात सुरु असलेल्या बचाव मोहिमेची माहिती दिली जात आहे.

ठळक मुद्देतालिबानसोबतची चर्चा आणि अफगाणिस्तानात भारतीय गुंतवणुकीच्या सुरक्षेसारख्या अनेक मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा होणार भारत तालिबानसह सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मागे हटणार नाही. देशहितावर प्राधान्य दिलं जाईलजर तालिबानसोबत सरळ चर्चा होणार नसेल तर बॅकडोर डिप्लोमेसीचा पर्याय भारताकडे खुला

नवी दिल्ली – अफगाणिस्तानवर(Afghanistan) तालिबानची(Taliban) सत्ता आल्यानंतर जगातील राजकीय वातावरण बदललं आहे. चीननं त्यांचा डाव खेळला आहे. रशिया आणि पाकिस्तानही पडद्यामागून त्यांची रणनीती आखत आहे. तालिबानसोबतभारताची चर्चा सुरु आहे परंतु अधिकृतपणे काहीही सांगता येत नाही. भारतानं सौम्य भूमिका घेत सर्व पर्याय खुले ठेवण्याचे संकेत दिले आहेत. अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. ज्यात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आढावा देतील.

विविध राजकीय पक्षांच्या सभागृहातील नेत्यांना अफगाणिस्तानात सुरु असलेल्या बचाव मोहिमेची माहिती दिली जात आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना कसं आणि कधी परत आणलं जाईल. आतापर्यंत किती आले अजून किती बाकी आहेत. किती अफगाणी नागरिकांना वाचवलं आहे. अल्पसंख्याक समुदायाचे किती आहेत. तालिबानसोबतची चर्चा आणि अफगाणिस्तानात भारतीय गुंतवणुकीच्या सुरक्षेसारख्या अनेक मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा होणार आहे.

भारत घेणार सौम्य भूमिका

सूत्रांच्या माहितीनुसार, भारत तालिबानसह सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मागे हटणार नाही. देशहितावर प्राधान्य दिलं जाईल. मागील १० दिवसांचा घटनाक्रम पाहिला तर त्यात वेगाने घडामोडी बदलत आहेत. भारताने अद्याप तटस्थ भूमिका घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जगातील ताकदवान देश स्पष्ट शब्दात तालिबानला आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकानुसार शासन चालवणार असेल तर मान्यता देईल तेव्हाच सौम्य भूमिका घेतली जाईल. मानवाधिकार अंतर्गत महिलांचा अधिकारावर तालिबान त्यांच्या जुन्या भूमिकेत बदल करेल आणि सुधारणा करेल.

निष्पक्षपणे चर्चा करण्याच्या अटीवर भारतासोबत संवाद - तालिबान

तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद सुहैल शाहीन यांनी मागील काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, भारत आणि तालिबान यांच्यात कुठलीही चर्चा झाली नाही. निष्पक्षपणे चर्चा होणार असेल तर भारताशी संवाद साधला जाईल. दोहा करारानुसार, तालिबान कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेला अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर जगातील इतर देशांविरोधात हल्ला करण्यासाठी देणार नाही हे स्पष्ट आहे.

भारताकडे प्लॅन B?

जर तालिबानसोबत सरळ चर्चा होणार नसेल तर बॅकडोर डिप्लोमेसीचा पर्याय भारताकडे खुला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल मागील दोन आठवड्यापासून खास सक्रीय झाले आहेत. त्यांनी BRICS देशांमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांशी अफगाणिस्तान मुद्द्यांवर चर्चा केली आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांच्यासोबतही डोभाल यांचा संवाद झाला आहे. मागील आठवड्यात सुरक्षेवर कॅबिनेट समितीसमोर डोभार यांनी सर्व माहिती समोर ठेवली आहे.

तालिबान बदललं नाही, इमरजेन्सी प्लॅन तयार – CDS

तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत म्हणाले की, तालिबान २० वर्षात बदलला नाही केवळ त्याचे सहकारी बदललेत. तालिबान हा २० वर्षापूर्वीचा आहे. तालिबान तोच आहे परंतु त्याचे सहकारी बदललेत. अफगाणिस्तानात होणाऱ्या दहशतवादी हालचाली भारतासाठी चिंतेच्या आहेत. अशा आव्हानाचा सामना करण्यासाठी आपत्कालीन योजना तयार करण्यात आली आहे. अफगाणिस्तानात ज्या वेगाने बदल घडला त्यामुळे आम्ही आश्चर्यचकीत आहोत. त्यामुळे आम्ही देखील इमरजेन्सी योजना आखल्या आहेत. त्यासाठी तयार आहोत असं जनरल रावत यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारत