शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

India Taliban Talks: अफगाणिस्तानमधील स्थितीवर सर्वपक्षीय बैठक; तालिबानी हालचालींवर भारताची भूमिका ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 13:07 IST

विविध राजकीय पक्षांच्या सभागृहातील नेत्यांना अफगाणिस्तानात सुरु असलेल्या बचाव मोहिमेची माहिती दिली जात आहे.

ठळक मुद्देतालिबानसोबतची चर्चा आणि अफगाणिस्तानात भारतीय गुंतवणुकीच्या सुरक्षेसारख्या अनेक मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा होणार भारत तालिबानसह सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मागे हटणार नाही. देशहितावर प्राधान्य दिलं जाईलजर तालिबानसोबत सरळ चर्चा होणार नसेल तर बॅकडोर डिप्लोमेसीचा पर्याय भारताकडे खुला

नवी दिल्ली – अफगाणिस्तानवर(Afghanistan) तालिबानची(Taliban) सत्ता आल्यानंतर जगातील राजकीय वातावरण बदललं आहे. चीननं त्यांचा डाव खेळला आहे. रशिया आणि पाकिस्तानही पडद्यामागून त्यांची रणनीती आखत आहे. तालिबानसोबतभारताची चर्चा सुरु आहे परंतु अधिकृतपणे काहीही सांगता येत नाही. भारतानं सौम्य भूमिका घेत सर्व पर्याय खुले ठेवण्याचे संकेत दिले आहेत. अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. ज्यात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आढावा देतील.

विविध राजकीय पक्षांच्या सभागृहातील नेत्यांना अफगाणिस्तानात सुरु असलेल्या बचाव मोहिमेची माहिती दिली जात आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना कसं आणि कधी परत आणलं जाईल. आतापर्यंत किती आले अजून किती बाकी आहेत. किती अफगाणी नागरिकांना वाचवलं आहे. अल्पसंख्याक समुदायाचे किती आहेत. तालिबानसोबतची चर्चा आणि अफगाणिस्तानात भारतीय गुंतवणुकीच्या सुरक्षेसारख्या अनेक मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा होणार आहे.

भारत घेणार सौम्य भूमिका

सूत्रांच्या माहितीनुसार, भारत तालिबानसह सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मागे हटणार नाही. देशहितावर प्राधान्य दिलं जाईल. मागील १० दिवसांचा घटनाक्रम पाहिला तर त्यात वेगाने घडामोडी बदलत आहेत. भारताने अद्याप तटस्थ भूमिका घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जगातील ताकदवान देश स्पष्ट शब्दात तालिबानला आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकानुसार शासन चालवणार असेल तर मान्यता देईल तेव्हाच सौम्य भूमिका घेतली जाईल. मानवाधिकार अंतर्गत महिलांचा अधिकारावर तालिबान त्यांच्या जुन्या भूमिकेत बदल करेल आणि सुधारणा करेल.

निष्पक्षपणे चर्चा करण्याच्या अटीवर भारतासोबत संवाद - तालिबान

तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद सुहैल शाहीन यांनी मागील काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, भारत आणि तालिबान यांच्यात कुठलीही चर्चा झाली नाही. निष्पक्षपणे चर्चा होणार असेल तर भारताशी संवाद साधला जाईल. दोहा करारानुसार, तालिबान कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेला अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर जगातील इतर देशांविरोधात हल्ला करण्यासाठी देणार नाही हे स्पष्ट आहे.

भारताकडे प्लॅन B?

जर तालिबानसोबत सरळ चर्चा होणार नसेल तर बॅकडोर डिप्लोमेसीचा पर्याय भारताकडे खुला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल मागील दोन आठवड्यापासून खास सक्रीय झाले आहेत. त्यांनी BRICS देशांमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांशी अफगाणिस्तान मुद्द्यांवर चर्चा केली आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांच्यासोबतही डोभाल यांचा संवाद झाला आहे. मागील आठवड्यात सुरक्षेवर कॅबिनेट समितीसमोर डोभार यांनी सर्व माहिती समोर ठेवली आहे.

तालिबान बदललं नाही, इमरजेन्सी प्लॅन तयार – CDS

तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत म्हणाले की, तालिबान २० वर्षात बदलला नाही केवळ त्याचे सहकारी बदललेत. तालिबान हा २० वर्षापूर्वीचा आहे. तालिबान तोच आहे परंतु त्याचे सहकारी बदललेत. अफगाणिस्तानात होणाऱ्या दहशतवादी हालचाली भारतासाठी चिंतेच्या आहेत. अशा आव्हानाचा सामना करण्यासाठी आपत्कालीन योजना तयार करण्यात आली आहे. अफगाणिस्तानात ज्या वेगाने बदल घडला त्यामुळे आम्ही आश्चर्यचकीत आहोत. त्यामुळे आम्ही देखील इमरजेन्सी योजना आखल्या आहेत. त्यासाठी तयार आहोत असं जनरल रावत यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारत