शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

केंद्रीय कर्मचा-यांचे किमान वेतन २१ हजार, सरकार करतेय प्रस्तावावर विचार; भत्तेही वाढणार, पेन्शनधारकांसह सर्वांना मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:52 IST

केंद्र सरकार केंद्रीय कर्मचा-यांना लवकरच खूशखबर देणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर केंद्राने मंजुरीसह शिक्कामोर्तब करताना केंद्रीय कर्मचा-यांचे किमान वेतन दरमहा १८ हजार रुपये करण्याच्या प्रस्तावाला संमती दिली होती.

नवी दिल्ली : केंद्र सरकार केंद्रीय कर्मचा-यांना लवकरच खूशखबर देणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर केंद्राने मंजुरीसह शिक्कामोर्तब करताना केंद्रीय कर्मचा-यांचे किमान वेतन दरमहा १८ हजार रुपये करण्याच्या प्रस्तावाला संमती दिली होती. केंद्र सरकार आता किमान वेतन दरमहा २१ हजार रुपये करण्याच्या विचारात आहे. यासोबतच संरक्षण कर्मचाºयांसह केंद्रीय सेवेतील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव भत्तेही मिळणार आहेत. आता केवळ सरकारच्या मंजुरीचीची प्रतीक्षा आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने २८ जून रोजी २४ दुरुस्त्यांसह सातव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली होती. आता वाढीव भत्ते १ जुलै २०१७पासून दिले जातील. केंद्रीय कर्मचारी किमान वेतन दरमहा २५ हजार रुपये करण्याची मागणी करीत आहेत. तथापि, सरकार किमान वेतन दरमहा १८ हजार रुपयांऐवजी २१ हजार रुपये करण्याची शक्यता आहे. वेतनवाढ १ जानेवारी २०१६पासून लागू करण्याचा सरकार विचार करीत असल्याचे कळते.वित्त मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाचिनमध्ये तैनात जवानांना मिळणारा भत्ता १४ हजार रुपयांवरून दुप्पट म्हणजे ३० हजार रुपये करण्यात आला आहे. तसेच अतिजोखमीच्या भागात तैनात अधिकाºयांनाही मिळणारा भत्ता २१ हजार रुपयांवरून ४२ हजार५०० रुपये करण्यात आला आहे. याशिवाय इस्पितळातील शुश्रूषा आणि लिपिक सेवेतीलकर्मचाºयांचा भत्ताही दरमहा ४,८०० रुपयांऐवजी ७,२०० रुपये करण्यात आला आहे. शस्त्रक्रियागारातील सेवेसाठी मिळणारा भत्ताहीदरमहा ५४० रुपये करण्यातआला आहे. मरीन कमांडोजनाआता दरमहा १७,३०० रुपये भत्ता मिळेल.दरम्यान, ओडिशा सरकारनेही २६ सप्टेंबरपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केलीआहे.३0 हजार ७४८ कोटींचा बोजा-पेन्शनधारकांना मिळणारा वैद्यकीय भत्ताही दुप्पट करण्यात आला आहे. वाढीनुसार तो आता दरमहा पाचशे रुपयांऐवजी एक हजार रुपये करण्यात आला आहे. सुधारित वाढीव भत्त्यांमुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक ३०,७४८.२३ कोटी रुपयांचा बोजा पडेल. जवळपास ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि तेवढ्याच पेन्शनधारकांनाही वाढीव भत्त्यांचा लाभ मिळणार आहे.