शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य, केंद्र सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 3:49 AM

कांद्याची वाढलेली आवक आणि जवळपास बंद झालेली निर्यात यामुळे आठवड्यापासून कोसळणारे भाव सावरण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील अधिसूचना सरकारने काढली. यामुळे निर्यात वाढून कांद्याचे भाव स्थिरावण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

लासलगाव (जि. नाशिक) : कांद्याची वाढलेली आवक आणि जवळपास बंद झालेली निर्यात यामुळे आठवड्यापासून कोसळणारे भाव सावरण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील अधिसूचना सरकारने काढली. यामुळे निर्यात वाढून कांद्याचे भाव स्थिरावण्यास मदत होण्याची शक्यता आहे.जानेवारीच्या तिसºया सप्ताहात केंद्राने कांद्याचे किमान निर्यातमूल्य कमी केल्यानंतरही निर्यातीमध्ये न झालेली वाढ, वाढलेली आवक यामुळे गेला सप्ताहभर कांद्याच्या दरांमध्ये मोठी घसरण होत होती. लासलगावच्या कांदा बाजारामध्ये मागच्या सोमवारी तर सरासरी दरामध्ये ९०० रुपयांची घसरण झाल्याने बळीराजा धास्तावला होता. बाजारात नवीन कांद्याची आवक वाढलेली असताना केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य १५० डॉलरने कमी करून ७०० डॉलर प्रतिटन केले. परंतु श्रीलंका वगळता अन्य कोणत्याही देशामध्ये सध्या कांद्याची निर्यात सुरू नव्हती. यानंतर कांद्याचे निर्यातमूल्य हटवण्यात यावे यासाठी राज्याचे कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनीही केंद्राकडे पाठपुरावा केला होता. सरकारने निर्यातीला वेसण घालून देशी बाजारात कांदा रहावा म्हणून किमान निर्यातमूल्य ८५० डॉलर प्रतिटन केले होते. त्यानंतर ते ७०० डॉलर प्रतिटन असे खाली आले.सर्वाधिक निर्यात महाराष्ट्रातूनभारतातील एकूण कांदा निर्यातीत ८० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. उर्वरीत २० टक्यांमध्ये कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश होतो. यंदाही सर्वाधिक निर्यात महाराष्ट्रातून झालेली आहे. यापैकी ७५ टक्के निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून झाली आहे.

टॅग्स :onionकांदाMarketबाजारGovernmentसरकार