शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

राजस्थानमध्ये आठ दिवसांत 17,000 पक्ष्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 10:07 IST

राजस्थानच्या जयपूरमध्ये असलेल्या सांभर तलावात हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देराजस्थानच्या जयपूरमध्ये असलेल्या सांभर तलावात हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.गेल्या आठ दिवसांत जवळपास 17,000 पक्ष्यांचा मृत्यू झाला.हिमालय, सायबेरिया, उत्तर आशियासह अन्य देशांमधून आलेल्या पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.

जयपूर - राजस्थानच्या जयपूरमध्ये असलेल्या सांभर तलावात हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या आठ दिवसांत जवळपास 17,000 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. या भागात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. काही स्थलांतरीत पक्षीही दरवर्षी सांभार तलावात येत असतात. मात्र आता पक्ष्यांचा मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 

जयपूरचे जिल्हा कलेक्टर जगरूप सिंह यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांभर तलावात हजारो पक्षी येत असतात. मात्र पक्षांचा मृत्यू झाला आहे. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी वन विभागाला तातडीने माहिती दिली. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. सर्व मृत पक्षी वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करून हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. अशा घटना रोखण्यासाठी सरकार कठोर पावलं उचलत असल्याचं देखील गहलोत यांनी म्हटलं आहे. 

हिमालय, सायबेरिया, उत्तर आशियासह अन्य देशांमधून आलेल्या पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 17,000 हजार पक्ष्यांचा मृत्यू झालाचा दावा स्थानिक लोकांनी केला आहे. नॉदर्न शावलर, पिनटेल, कॉनम टील, रूडी शेल डक, कॉमन कूट गेडवाल, रफ, ब्लैक हेडड गल, ग्रीन बी ईटर, ब्लॅक शेल्डर काइट, कॅसपियन गल, ब्लॅक विंग्ड स्टील्ट, सेंड पाइपर, मार्श सेंड पाइपर, कॉमस सेंड पाइपर, वुड सेंड पाइपर पाइड ऐबोसिट, केंटिस प्लोवर, लिटिल रिंग्स प्लोवर, लेसर सेंड प्लोवर या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

हजारो पक्ष्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झालेला नाही. तर सांभर तलावाच्या पाण्यात विषारी पदार्थ मिसळल्याने पक्ष्यांचा मृत्यू झाला असावा असे प्राथमिक तपासातून समोर येत असल्याची माहिती पक्ष्यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या टीममधील एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक हे जयपूरमधील सांभर तलावाजवळ स्थलांतरीत पक्षी पाहण्यासाठी येत असतात. लाखो पक्षी या तलावावर येत असतात. यामध्ये जवळपास 50 हजार फ्लेमिंगो आणि 1 लाख वेडर्स असतात.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानDeathमृत्यू