शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

१० कोटी शाळकरी मुलांसाठी माध्यान्ह भोजन; सरकारला हजारो कोटींचा अतिरिक्त खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 01:47 IST

आयुष्यमान भारत योजनेतहत दहा कोटी कुटुंबियांसाठी आरोग्य विमा योजना घोषित केल्यानंतर सरकार आता देशभरातील ११.५ लाख शासकीय आणि अनुदानित शाळांतील जवळपास दहा कोटी मुलांसाठी माध्यान्ह भोजन योजनेची भव्य भेट देणार आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : आयुष्यमान भारत योजनेतहत दहा कोटी कुटुंबियांसाठी आरोग्य विमा योजना घोषित केल्यानंतर सरकार आता देशभरातील ११.५ लाख शासकीय आणि अनुदानित शाळांतील जवळपास दहा कोटी मुलांसाठी माध्यान्ह भोजन योजनेची भव्य भेट देणार आहे. पंतप्रधानांकडून घोषित केल्या जाणाऱ्या या योजनेसाठी सरकारला हजारो कोटींचा अतिरिक्त खर्च येईल.माधान्य भोजनासाठी (२००६ च्या दराने) सरकार प्राथमिक मुलांसाठी प्रत्येकी ४ ते ६ रुपये देते. वाहतुकीचा खर्चासोबत दरमहा स्वयंपाकी आणि मदतनीसांसाठी एक हजार रुपये दिले जातात. या योजनेच्या निधीत सरकार किमान ३३ टक्के वाढ करण्याची शक्यता आहे, असे समजते.प्राथमिक शाळेतील माध्यान्ह भोजनाच्या खर्चात प्रत्येकी ४.१३ रुपये ते ६.१८ रुपयांची वाढ होईल. तसेच उच्च प्राथमिक शाळेसाठी या खर्चात प्रत्येकी ५.८८ रुपये ते ८.८८ रुपयांपर्यंत वाढ होईल. माध्यान्ह भोजन योजनेसाठी सरकारने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १०,५०० कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र २०१४-१५ या वर्षाच्या तुलनेत हा निधी कमी आहे. त्यावेळी १०,५२३ कोटी रुपये देण्यात आले होते.

टॅग्स :SchoolशाळाIndiaभारत