शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

'बुलेट ट्रेन फक्त श्रीमंतांसाठी, सर्वसामान्यांसाठी सुरक्षित रेल्वे व्यवस्था गरजेची'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 20:32 IST

भारतीय रेल्वे सेवेवर 'मेट्रो मॅन' ई. श्रीधरन यांचं परखड भाष्य

नवी दिल्ली: बुलेट ट्रेन फक्त श्रीमंतांसाठी आहे. देशातील सर्वसामान्य माणसाला सुरक्षित रेल्वे व्यवस्था पुरवणं गरजेचं आहे, असं मत 'मेट्रो मॅन' म्हणून संपूर्ण देशाला सुपरिचित असणाऱ्या ई. श्रीधरन यांनी व्यक्त केलं. बुलेट ट्रेन अतिशय महाग असल्यानं ती सामान्य माणसाला परवडणारी नाही, असं 86 वर्षांच्या श्रीधरन यांनी म्हटलं. देशाला आता बुलेट ट्रेनची नव्हे, तर स्वच्छ, सुरक्षित आणि वेगवान रेल्वे व्यवस्थेची आवश्यकता आहे, असं ते म्हणाले. 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत 'मेट्रो मॅन' श्रीधरन यांनी देशातील रेल्वे सेवेबद्दल मोकळेपणानं भाष्य केलं. भारतीय रेल्वेत झालेल्या बदलांबद्दल प्रश्न विचारल्यावर श्रीधरन यांनी त्यांचे परखड विचार मांडले. 'रेल्वेतील बायो टॉयलेट्सचा विचार केल्यास त्यामध्ये अनेक तांत्रिक सुधारणा व्हायच्या आहेत. रेल्वे गाड्यांचा वेग वाढलेला नाही. उलट प्रमुख गाड्यांचा वेग कमी झाला आहे. रेल्वे गाड्या वेळेवर येणं, त्या वेळापत्रकानुसार धावणं, हे आजही आपल्यासाठी मोठं आव्हान आहे. रेल्वे अपघातांची संख्या कमी झालेली नाही. लेव्हल क्रॉसिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे,' असं म्हणत श्रीधरन यांनी रेल्वे विभागाच्या अपयशाचा पाढा वाचून दाखवला. विकसित देशांमधील रेल्वे सेवांचा विचार केल्यास भारतीय रेल्वे तब्बल 20 वर्ष मागे असल्याचं श्रीधरन म्हणाले. 'देशाच्या विकासाच्या वेगाबद्दल मी अतिशय उत्सुक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षांचा कालावधी लोटला. तरीही देशाची एक तृतीयांश लोकसंख्या अद्यापही दारिद्र्य रेषेखाली आहे. राजकीय नेत्यांना स्वत:चं राजकीय लक्ष्य गाठण्यात जास्त स्वारस्य आहे,' अशा शब्दांमध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं.  

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनMetroमेट्रोrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेNarendra Modiनरेंद्र मोदी