शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षा, निकालामुळे मानसिक तणाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 15:25 IST

देशातील ६वी ते १२वी इयत्तेतील ७३ टक्के विद्यार्थी शालेय जीवनाबद्दल काही प्रमाणात समाधानी आहेत. तर ३३ टक्के विद्यार्थ्यांना शालेय जीवन व शिक्षणात काहीतरी कमतरता असल्याचे जाणवत राहते. ते त्या वातावरणात दबून जातात. 

नवी दिल्ली : देशातील शालेय विद्यार्थ्यांपैकी ८१ टक्के विद्यार्थी अभ्यास, परीक्षा, निकाल यामुळे मानसिक तणावाखाली असतात. हा त्रास माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना जास्त जाणवतो. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) या संस्थेने नुकत्याच केलेल्या पाहणीत हा निष्कर्ष काढण्यात आला.

देशातील ६वी ते १२वी इयत्तेतील ७३ टक्के विद्यार्थी शालेय जीवनाबद्दल काही प्रमाणात समाधानी आहेत. तर ३३ टक्के विद्यार्थ्यांना शालेय जीवन व शिक्षणात काहीतरी कमतरता असल्याचे जाणवत राहते. ते त्या वातावरणात दबून जातात. 

ऑनलाइन पद्धतीने जे शिकविले जाते ते ५१ टक्के विद्यार्थ्यांना नीट उमजत नाही. शिक्षकांनी शिकविलेला धडा समजून घेण्यात त्यांना काही अडचणी येतात. 

३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत करण्यात आलेल्या या पाहणीत ३.७९ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. असे एनसीईआरटीने केलेल्या पाहणीच्या निष्कर्षात म्हटले आहे. 

शिक्षकांनी पुढाकार घेणे अपेक्षितकेंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केले आहे. त्यातील तरतुदींनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तम रितीने कसे शिकवावे याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. शिक्षकांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा बारकाईने वाचावा व त्यातील गोष्टींच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेणे केंद्र सरकारला अपेक्षित आहे. 

सर्वेक्षण का केले?केंद्र सरकारने शिक्षक पर्व दरम्यान घेतलेल्या अनेक उपक्रमांसह हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. कोरोना महामारीनंतर देशातील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्राने केलेले हे पहिले सर्वेक्षण आहे. शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आणि शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षक पर्व साजरे केले जात आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा