शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षा, निकालामुळे मानसिक तणाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 15:25 IST

देशातील ६वी ते १२वी इयत्तेतील ७३ टक्के विद्यार्थी शालेय जीवनाबद्दल काही प्रमाणात समाधानी आहेत. तर ३३ टक्के विद्यार्थ्यांना शालेय जीवन व शिक्षणात काहीतरी कमतरता असल्याचे जाणवत राहते. ते त्या वातावरणात दबून जातात. 

नवी दिल्ली : देशातील शालेय विद्यार्थ्यांपैकी ८१ टक्के विद्यार्थी अभ्यास, परीक्षा, निकाल यामुळे मानसिक तणावाखाली असतात. हा त्रास माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना जास्त जाणवतो. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) या संस्थेने नुकत्याच केलेल्या पाहणीत हा निष्कर्ष काढण्यात आला.

देशातील ६वी ते १२वी इयत्तेतील ७३ टक्के विद्यार्थी शालेय जीवनाबद्दल काही प्रमाणात समाधानी आहेत. तर ३३ टक्के विद्यार्थ्यांना शालेय जीवन व शिक्षणात काहीतरी कमतरता असल्याचे जाणवत राहते. ते त्या वातावरणात दबून जातात. 

ऑनलाइन पद्धतीने जे शिकविले जाते ते ५१ टक्के विद्यार्थ्यांना नीट उमजत नाही. शिक्षकांनी शिकविलेला धडा समजून घेण्यात त्यांना काही अडचणी येतात. 

३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत करण्यात आलेल्या या पाहणीत ३.७९ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. असे एनसीईआरटीने केलेल्या पाहणीच्या निष्कर्षात म्हटले आहे. 

शिक्षकांनी पुढाकार घेणे अपेक्षितकेंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केले आहे. त्यातील तरतुदींनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तम रितीने कसे शिकवावे याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. शिक्षकांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा बारकाईने वाचावा व त्यातील गोष्टींच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेणे केंद्र सरकारला अपेक्षित आहे. 

सर्वेक्षण का केले?केंद्र सरकारने शिक्षक पर्व दरम्यान घेतलेल्या अनेक उपक्रमांसह हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. कोरोना महामारीनंतर देशातील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्राने केलेले हे पहिले सर्वेक्षण आहे. शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आणि शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षक पर्व साजरे केले जात आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा