शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
4
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
5
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
6
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
7
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
8
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
9
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
10
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
11
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
12
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
14
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
15
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
16
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
17
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
18
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
19
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
20
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

मेडीगड्डा बॅरेजमुळे तेलंगणा तुपाशी, महाराष्ट्र उपाशी; राज्य शासनाकडून सिंचनाचे नियोजनच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 12:22 IST

तब्बल ८५ गेट असलेला हा मेडीगड्डा बॅरेज तेलंगणा सरकारने अवघ्या तीन ते साडेतीन वर्षांत बांधून पूर्ण केला. या भल्या मोठ्या प्रकल्पाचे पाणी थेट हैदराबादपर्यंत नेले जात आहे.

गडचिरोली : तेलंगणा सरकारने महाराष्ट्राच्या सीमेवरील गोदावरी नदीवर तीन वर्षांपूर्वी उभारलेल्या महत्त्वाकांक्षी मेडीगड्डा बॅरेजमुळे तेलंगणातील लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. या पाण्यातून वर्षाकाठी तीन पिके घेऊन त्या भागातील शेतकरी सुजलाम् सुफलाम् होत आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या हद्दीतील शेतकऱ्यांना एकही थेंब पाणी सिंचनासाठी घेण्याचे नियोजन राज्य सरकारने केले नसल्यामुळे हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यासाठी ‘पांढरा हत्ती’ ठरत आहे.तब्बल ८५ गेट असलेला हा मेडीगड्डा बॅरेज तेलंगणा सरकारने अवघ्या तीन ते साडेतीन वर्षांत बांधून पूर्ण केला. या भल्या मोठ्या प्रकल्पाचे पाणी थेट हैदराबादपर्यंत नेले जात आहे. तेलंगणातील लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. या बॅरेजच्या बुडीत क्षेत्रात महाराष्ट्राच्या हद्दीतील १५ पेक्षा अधिक गावे आली आहेत. पावसाळ्यात बॅरेजचे गेट उघडले जातात, त्यावेळी सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरून पिके व सुपीक माती खरडून निघते, याशिवाय पाणी अडविणे सुरू होते. त्यावेळी गोदावरी आणि प्राणहिता नदीचे बॅकवॉटरही शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरते. गोदावरी आणि प्राणहिता नद्यांवर उपसा सिंचन योजना उभारल्यास लाभ होऊ शकतो. दरम्यान, पुष्कर मेळ्याच्या निमित्ताने सिरोंचात गेलेले गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी यांचे काही शेतकऱ्यांनी याकडे लक्ष वेधले. त्यामुळे त्यांनी बॅरेजला भेट देऊन प्रकल्पाचे मुख्य अभियंता विश्वकर्मालू, तिरुपती राव, उपअभियंता रवि जलसा यांच्यासोबत चर्चा करून राज्य सरकारचे याकडे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले.

विधिमंडळात मुद्दा उपस्थित करणारवनकायद्याची अडचण पुढे करत शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित ठेवणे योग्य नाही. राज्य सरकारने रमेशगुडम, पेंटीपाका, झिंगानूर येथे उपसा सिंचन प्रकल्प उभारल्यास गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही त्या पाण्याचा फायदा होईल. या संदर्भात जलसंपदामंत्र्यांशी चर्चा करणार असून, विधिमंडळातही हा मुद्दा उपस्थित करणार आहे, असे आ.डॉ.देवराव होळी म्हणाले. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाDamधरणMaharashtraमहाराष्ट्र