शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

हजारो लोक बुडत असताना एका व्यक्तीसाठी सरदार सरोवर भरले, मेधा पाटकर यांची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 15:53 IST

सरदार सरोवरातील पाण्याची पातळी वाढवण्यावरून नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

मुंबई - सरदार सरोवरातील पाण्याची पातळी वाढवण्यावरून नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सरदार सरोवरामधील पाण्याची पातळी मुदतीआधीच वाढवण्यात आली, असा आरोप मेधा पाटकर यांनी केला. सरदार सरोवर धरणातील पाण्याची पाकऴी वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयावरून टीका करताना  त्या म्हणाल्या,"धरणाच्या बुडीत क्षेत्रामधील हजारो गावकरी पाण्याखाली जात असताना केवळ नरेंद्र मोदींसाठी धरणातील पाण्याचा पातळी वाढवली गेली. त्यामुळे मध्य प्रदेशातील धरण्याच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावांना फटका बसला आहे.''  सरदार सरोवर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावकऱ्यांचे अद्याप पूनर्वसन झालेले नाही. यावेळी धरणातील पाण्याची पातळी मुदतीआधीच वाढवण्याचा निर्णय घेतला गेला. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस 17 सप्टेंबरला असतो म्हणूनच मुदतीआधी धरणातील पाणी पातळी वाढवली गेली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही सरदार सरोवर प्रकल्पातील विस्थापितांना अद्याप मोबदला दिला गेलेला नाही, असा आरोपही पाटकर यांनी केला.  मेधा पाटकर पुढे म्हणाल्या की, "गुजरात सरकारने सरदार सरोवरातील पाण्याची पातळी 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात येईल, असे सांगितले होते. पुढे ही तारीख 30 सप्टेंबर करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात मोदींच्या वाढदिवशीच 17 सप्टेंबर रोजी धरणातील पाण्याची पातळी वाढवली गेली. हजारो नागरिक धरणाच्या वाढत्या पाण्यात बुडत असताना केवळ एका व्यक्तीसाठी धरणातील पाणी वाढवले गेले. त्यामुळेच आम्ही आंदोलकांनी मोदींचा वाढदिवस धिक्कार दिवस म्हणून साजरा केला, असे मेधा पाटकर यांनी सांगितले.  

टॅग्स :DamधरणWaterपाणीMedha Patkarमेधा पाटकरNarendra Modiनरेंद्र मोदी