मादनाईक यांनी न केलेल्या कामाचे श्रेय लाटू नये
By Admin | Updated: May 9, 2014 18:10 IST2014-05-09T18:10:51+5:302014-05-09T18:10:51+5:30

मादनाईक यांनी न केलेल्या कामाचे श्रेय लाटू नये
>* संभाजीपूरच्या सरपंचाचा इशाराजयसिंगपूर : जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अनिल मादनाईक हे संभाजीपूरसाठी ५ कोटी रूपये खर्चाची पाणी योजना मंजूर केली असल्याची चुकीची माहिती देवून जनतेची दिशाभूल करीत आहेत. या योजनेला शिफारस देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या बैठकीमध्ये मंजूर होणार असून बैठक होण्यापूर्वीच केवळ श्रेयवादासाठी मादनाईक यांच्याकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप, सरपंच सौ. सविता पाटील-कोथळीकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. संभाजीपूरची पाणी योजना प्रति मानशी जवळपास चार हजार इतक्या खर्चाची असून या योजनेला अंतिम मंजूरी देणेचे काम राज्य शासनाच्या अखत्यारीत येते. जिल्हा परिषदेने केवळ शिफारस देणेचे असते असे असताना योजना आम्हीच मंजूर केली अशी माहिती जनतेला देणे चुकीचे आहे. ही योजना लवकरात लवकर मंजूर व्हावी यासाठी आ. डॉ. सा. रे. पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर व संजय पाटील-यड्रावकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून या पुढेही जिल्हा परिषदेच्या शिफारशीनंतर अंतिम मंजूरीसाठी शासनाकडे जाणार्या या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळवून देणेसाठी राज्याचे पाणी पुरवठा मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत. त्यामुळे मादनाईक यांनी न केलेल्या कामाचा श्रेयवाद घेणे यापुढे बंद करावे, असा इशारा ही सरपंच कोथळीकर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)