शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

‘इंदिरा गांधी पंतप्रधान होताच माझ्या वडिलांना पदावरुन काढलं', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 17:30 IST

MEA S Jaishankar : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वडील तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये ब्युरोक्रॅट होते.

MEA S Jaishankar : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indhira Gandhi) यांच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. इंदिरा गांधींनी त्यांच्या वडिलांना पदावरुन हटवले, असे जयशंकर म्हणाले. ते म्हणाले की, 'माझे वडील ज्येष्ठ नोकरशहा(ब्युरोक्रॅट) होते, नंतर ते सचिव झाले. पण, इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांना पदावरुन हटवण्यात आले. 

जयशंकर यांनी त्यांच्या प्रवासाविषयी माहिती दिली. नोकरशाहीतून राजकारणात कसे आलो, हे त्यांनी सांगितले. जयशंकर हे जानेवारी 2015 ते जानेवारी 2018 पर्यंत परराष्ट्र सचिव होते, त्यापूर्वी त्यांनी चीन आणि अमेरिकेसह महत्त्वाच्या देशांमध्ये राजदूत म्हणून काम केले होते. 2019 मध्ये मोदी सरकार सत्तेत परतल्यावर पंतप्रधान मोदींनी त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले आणि त्यांना परराष्ट्र मंत्री केले.

जयशंकर यांचे वडील के सुब्रह्मण्यम हे भारतातील आघाडीच्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीतीकारांपैकी एक मानले जातात. 2011 मध्ये त्यांचे निधन झाले. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वडिलांबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, 1979 मध्ये त्यावेळच्या जनता सरकारमध्ये ते सर्वात तरुण सचिव झाले. 1980 मध्ये ते संरक्षण उत्पादन सचिव होते. 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा निवडून आल्या, तेव्हा त्यांनी काढून टाकलेले पहिले सचिव माझे पडील होते. नोकरशाहीत त्यांना त्यांची कारकीर्द ठप्प झालेली दिसली. राजीव गांधींच्या काळातही त्यांना दडपण्याचे काम झाले, अशी माहिती जयशंकर यांनी दिली. 

मोठा भाऊ सचिव झाला तेव्हा...जयशंकर पुढे म्हणाले की, त्यांचे वडील खूप प्रामाणिक व्यक्ती होते, कदाचित यामुळे समस्या उद्भवली असेल. नोकरशाहीत त्यांना त्यांची कारकीर्द रखडलेली दिसली. त्यानंतर ते पुन्हा सचिव झाले नाहीत. राजीव गांधींच्या काळात त्यांच्या जागी एका कनिष्ठ व्यक्तीला कॅबिनेट सचिव बनवण्यात आले होते. आम्ही क्वचितच याबद्दल बोललो. म्हणूनच माझा मोठा भाऊ जेव्हा सेक्रेटरी झाला तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटला.

चीनमध्ये पहिल्यांदाच मोदींची भेट घेतलीमोदी सरकारमध्ये मंत्री झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी मला मंत्रिमंडळात सामील होण्यास सांगितले. 2011 मध्ये माझी त्यांच्याशी चीनमध्ये पहिली भेट झाली होती. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ते तिथे आले होते. खरे सांगायचे तर त्यांनी माझ्यावर खूप मोठा प्रभाव पाडला. 2011 पर्यंत मी अनेक मुख्यमंत्र्यांना येताना पाहिले होते, पण त्यांच्यापेक्षा जास्त तयारी करुन कोणी आलेले नाही.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndira Gandhiइंदिरा गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस