शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

‘इंदिरा गांधी पंतप्रधान होताच माझ्या वडिलांना पदावरुन काढलं', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 17:30 IST

MEA S Jaishankar : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वडील तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये ब्युरोक्रॅट होते.

MEA S Jaishankar : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indhira Gandhi) यांच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. इंदिरा गांधींनी त्यांच्या वडिलांना पदावरुन हटवले, असे जयशंकर म्हणाले. ते म्हणाले की, 'माझे वडील ज्येष्ठ नोकरशहा(ब्युरोक्रॅट) होते, नंतर ते सचिव झाले. पण, इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांना पदावरुन हटवण्यात आले. 

जयशंकर यांनी त्यांच्या प्रवासाविषयी माहिती दिली. नोकरशाहीतून राजकारणात कसे आलो, हे त्यांनी सांगितले. जयशंकर हे जानेवारी 2015 ते जानेवारी 2018 पर्यंत परराष्ट्र सचिव होते, त्यापूर्वी त्यांनी चीन आणि अमेरिकेसह महत्त्वाच्या देशांमध्ये राजदूत म्हणून काम केले होते. 2019 मध्ये मोदी सरकार सत्तेत परतल्यावर पंतप्रधान मोदींनी त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले आणि त्यांना परराष्ट्र मंत्री केले.

जयशंकर यांचे वडील के सुब्रह्मण्यम हे भारतातील आघाडीच्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीतीकारांपैकी एक मानले जातात. 2011 मध्ये त्यांचे निधन झाले. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वडिलांबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, 1979 मध्ये त्यावेळच्या जनता सरकारमध्ये ते सर्वात तरुण सचिव झाले. 1980 मध्ये ते संरक्षण उत्पादन सचिव होते. 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा निवडून आल्या, तेव्हा त्यांनी काढून टाकलेले पहिले सचिव माझे पडील होते. नोकरशाहीत त्यांना त्यांची कारकीर्द ठप्प झालेली दिसली. राजीव गांधींच्या काळातही त्यांना दडपण्याचे काम झाले, अशी माहिती जयशंकर यांनी दिली. 

मोठा भाऊ सचिव झाला तेव्हा...जयशंकर पुढे म्हणाले की, त्यांचे वडील खूप प्रामाणिक व्यक्ती होते, कदाचित यामुळे समस्या उद्भवली असेल. नोकरशाहीत त्यांना त्यांची कारकीर्द रखडलेली दिसली. त्यानंतर ते पुन्हा सचिव झाले नाहीत. राजीव गांधींच्या काळात त्यांच्या जागी एका कनिष्ठ व्यक्तीला कॅबिनेट सचिव बनवण्यात आले होते. आम्ही क्वचितच याबद्दल बोललो. म्हणूनच माझा मोठा भाऊ जेव्हा सेक्रेटरी झाला तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटला.

चीनमध्ये पहिल्यांदाच मोदींची भेट घेतलीमोदी सरकारमध्ये मंत्री झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी मला मंत्रिमंडळात सामील होण्यास सांगितले. 2011 मध्ये माझी त्यांच्याशी चीनमध्ये पहिली भेट झाली होती. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ते तिथे आले होते. खरे सांगायचे तर त्यांनी माझ्यावर खूप मोठा प्रभाव पाडला. 2011 पर्यंत मी अनेक मुख्यमंत्र्यांना येताना पाहिले होते, पण त्यांच्यापेक्षा जास्त तयारी करुन कोणी आलेले नाही.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndira Gandhiइंदिरा गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस