शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
5
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
6
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
7
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
8
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
9
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
12
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
13
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
14
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
15
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
16
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
17
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
18
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
19
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
20
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
Daily Top 2Weekly Top 5

"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 19:51 IST

परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरबाबत केलेल्या विधानावर भारताने आता भाष्य केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी महत्त्वाची माहिती दिली. पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास भारतही प्रत्युत्तर देणार. पाकिस्तानने अनेक वर्षांपासून दहशतवादाला खतपाणी घातलं असं म्हटलं आहे. 

"भारताला काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही" असं रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. तसेच युद्धविरामावर ट्रम्प यांना उत्तर देताना  परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, "जम्मू आणि काश्मीर हा फक्त भारत आणि पाकिस्तानमधील मुद्दा आहे. भारताच्या या धोरणात कोणताही बदल झालेला नाही आणि पाकिस्तानला पीओके खाली करावा आहे." 

"आम्ही पाकिस्तानने केलेलं विधान पाहिलं आहे. ज्या राष्ट्राने औद्योगिक स्तरावर दहशतवादाला पोसलं आहे त्याने असा विचार करावा की ते परिणामांपासून वाचू शकतील, तर हे स्वतःला मूर्ख बनवत आहे. भारताने नष्ट केलेली दहशतवादी पायाभूत सुविधांची ठिकाणं केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील इतर अनेक निष्पाप लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार होती. पाकिस्तान जितक्या लवकर ते स्वीकारेल तितकं चांगलं आहे. विजयाचा दावा करणं ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. त्यांनी १९७१, १९७५ आणि १९९९ कारगिल युद्धातही असंच केलं होतं" असं रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. 

"आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम

भारताने केवळ दहशतवाद्यांनाच नव्हे तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानी सैन्यालाही जोरदार प्रत्युत्तर देऊन आपली ताकद दाखवून दिल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.  पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर भारतीय हवाई दलाच्या योद्ध्यांना मोदींनी संबोधित केलं. "ज्या पाकिस्तानी सैन्यावर हे दहशतवादी अवलंबून होते त्यांना भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीयांनी पराभूत केलं आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला हे देखील दाखवून दिलं की पाकिस्तानमध्ये अशी कोणतीही जागा शिल्लक नाही जिथे दहशतवादी आरामात श्वास घेऊ शकतील. आम्ही घरात घुसून मारू आणि तुम्हाला पळून जाण्याची एकही संधी देणार नाही" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान