शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

'माया' आटली, मागणी वाढली; काँग्रेसची कोंडी करण्याची बसपाची खेळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 11:32 AM

मोदी सरकारला, भाजपाला पराभूत करायचं असेल तर एकीचं बळ अपरिहार्य असल्याची जाणीव विरोधकांना झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना धक्का देण्याचा काँग्रेसचा पक्का इरादा असला, तरी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींनी त्यांना पुन्हा पेचात टाकलं आहे.

लखनऊः 'मिशन २०१९' साठी सर्व विरोधकांची मोट बांधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना धक्का देण्याचा काँग्रेसचा पक्का इरादा असला, तरी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींनी त्यांना पुन्हा पेचात टाकलं आहे. उत्तर प्रदेशात सन्मानजनक जागा मिळाल्या तरच महाआघाडीत सहभागी होऊ, अशी अट त्यांनी आधीच ठेवलीय. आता त्यांना मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीतही योग्य वाटा हवा असल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यांच्या या दबावतंत्रामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याचीच शक्यता आहे. 

लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला, भाजपाला पराभूत करायचं असेल तर एकीचं बळ अपरिहार्य असल्याची जाणीव विरोधकांना झाली आहे. कर्नाटकमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएस-काँग्रेस-बसपा एकत्र आले, तर उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये सपा-बसपानं हातमिळवणी करून बाजी मारली. स्वाभाविकच, महाआघाडीच्या चर्चेला आणि जोडणीला जोर आला. परंतु, ही जुळवाजुळव काँग्रेससाठी सोपी नसल्याचं मायावतींच्या आणि अन्य काही पक्षांच्या पवित्र्यामुळे दिसतंय. 

सपा-बसपा युती लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहील, असा निर्धारच अखिलेश-मायावती यांनी केला आहे. त्यासाठी दोन पावलं मागे जायची तयारीही अखिलेश यांनी दाखवलीय. त्यामुळे मायावती आपल्या एकाही सभेत समाजवादी पार्टीला लक्ष्य करत नाही. याउलट, भाजपासोबत काँग्रेसवर त्या हल्ला चढवतात. महाआघाडीसाठी तयार आहोत, पण सन्मानजनक जागा दिल्या तरच; ही त्यांची ठाम भूमिका आहे आणि इथेच काँग्रेसची कोंडी होऊ शकते. आधी मायावतींची ही अट फक्त उत्तर प्रदेशपुरती मर्यादित होती. पण आता त्यांनी संधीचा फायदा घ्यायचं ठरवलंय. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत योग्य सन्मान न दिल्यास बसपा महाआघाडीत नसेल, असा पवित्रा त्यांनी घेतल्याचं कळतंय. 

उत्तर प्रदेश काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. तिथे सपा-बसपा एकत्र आल्यानं काँग्रेसला त्यांना धरूनच राहावं लागणार आहे. त्यांची ही अवस्था हेरूनच बसपानं रणनीती आखल्याचं दिसतंय. त्यामुळे मायावतींची 'माया' कायम ठेवण्यासाठी काँग्रेस काय करणार, हे पाहावं लागेल.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९mayawatiमायावतीNarendra Modiनरेंद्र मोदी