शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

"सरकारला बिहारच्या निवडणुका वेळेवर घ्यायच्या नाहीत का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 2:46 AM

मायावती यांचा सवाल : कोरोना, पुरामुळे जनजीवन विस्कळीत

लखनौ : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि बिहारातील नितीशकुमार सरकार यांच्यावर बिहार निवडणुकांच्या निमित्ताने बसपा नेत्या मायावती यांनी जोरदार शरसंधान केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारांना बिहारातील निवडणुका वेळेवर घ्यायच्या नाहीत का, असा सवाल मायावती यांनी केला आहे.मायावती यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटले की, बिहारातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. लाखो गरीब कुटुंबांची कोरोना महामारी आणि पुरामुळे पूर्ण वाताहत झाली आहे. लोक मेटाकुटीला आले आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. तथापि, त्यांना मदत पोहोचविण्याच्या बाबतीत सरकार पूर्णत: उदासीन असल्याचे दिसून येत आहे.मदतीचा अभाव हा राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला आहे. संतप्त झालेले लोक आमदारांना ओलीस धरीत आहेत. परिस्थिती इतकी विकोपाला गेली असली तरीही सरकार उदासीन आणि बेजाबदारच आहे. ही बाब अत्यंत दु:खदायक आणि अमानवी आहे. बिहारात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून अनेक जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. कोरोना महामारीची परिस्थितीही राज्यात दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मायावती यांनी केंद्र व राज्य सरकारांवर टीकास्त्र सोडले आहे.सर्वच पातळ्यांवर सरकारची बेशिस्तअन्य एका टष्ट्वीटमध्ये मायावती यांनी म्हटले आहे की, बिहार निवडणुका अत्यंत जवळ आलेल्या असताना जनतेच्या हिताबाबत तेथील सरकारकडून प्रत्येक पातळीवर बेशिस्तीचे आणि उदासीनतेचे प्रदर्शन केले जात आहे. ही बाब आश्चर्यकारक आहे. अशा वेळी एकच प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो की, विधानसभेच्या निवडणुका केंद्र सरकार आणि बिहार सरकार यांना वेळेवर घ्यायच्या नाहीत का?

टॅग्स :mayawatiमायावतीBiharबिहार