शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

झोपेत असतानाच इमारतीला लागली आग; कुवेतमध्ये ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 19:24 IST

Kuwait Fire: कुवेतमध्ये मजुरांच्या इमारतीला लागलेल्या आगीत ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला.

Kuwait Fire:  दक्षिण कुवेतमध्ये एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४० भारतीयांचा मृत्यू झाला. या भीषण आगीत इमारत पूर्णपणे जळून खाक झाली. ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत मजूर राहत होते. त्यातील बहुसंख्य हे भारतीय होते. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत परराष्ट्र मंत्र्‍यांना कुवेतला जाण्याचे आदेश दिले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेत काही लोकांचा मृत्यू आगीमुळे झाला. तर धुरामुळे गुदमरून मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

कुवेतमध्ये एका बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत ४० भारतीय नागरिकांसह ४१ लोकांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अल-मंगफ नावाच्या इमारतीत ही आग लागली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल सांगितले की मृतांमध्ये बहुतांश भारतीय नागरिक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. स्थानिक वेळेनुसार बुधवारी पहाटे चारच्या सुमारास ही भीषण आग लागली. ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत मोठ्या संख्येने भारतीय मजूर राहत होते.

या घटनेनंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह कुवेत दौऱ्यावर रवाना झाले आहेत. आगीच्या घटनेत जखमी झालेल्यांना मदतीची देखरेख करण्यासाठी आणि मृतांचे मृतदेह त्वरीत परत आणण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह तात्काळ कुवेतला रवाना झालेत.

पहाटे चार वाजता मजूर झोपलेले असताना आग लागल्याने अपघातातील मृतांचा आकडा वाढला. अचानक लागलेल्या आगीमुळे लोकांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही आणि झोपेतच त्यांचा जीव गुदमरला. ही इमारत एनबीटीसी ग्रुप नावाच्या कंपनीने घेतली असून त्यात १९५ कामगार राहत होते. यातील बहुतांश लोक हे केरळ, तामिळनाडू आणि काही उत्तर भारतीय राज्यांतील होते.

"कुवेतमधील कामगारांच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत केरळवासीयांसह ४० हून अधिक भारतीयांचा मृत्यू झाल्याने धक्का बसला आहे आणि शोक व्यक्त केला आहे. शोकाकुल कुटुंबियांबद्दल माझे मनःपूर्वक संवेदना आणि जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :fireआगAccidentअपघातNarendra Modiनरेंद्र मोदीsaudi arabiaसौदी अरेबिया