शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

उद्धव ठाकरेंच्या हाती 'मशाल' राहणार?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 09:07 IST

मशाल चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.

नवी दिल्ली – गेल्या वर्षी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्षात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. शिंदे-ठाकरे वादात शिवसेना कुणाची आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण कुणाला मिळणार हा प्रश्न उभा राहिला. त्यात निवडणूक आयोगाने कागदपत्राच्या आधारे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंच्या गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची कोंडी झाली. अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह तात्पुरते वापरण्यास दिले होते. मात्र या मशाल चिन्हावरही समता पार्टीने आक्षेप घेतला.

मशाल चिन्ह ही आमची निशाणी असून ती उद्धव ठाकरेंना देऊ नये अशी मागणी समता पार्टीने केली होती. त्याबाबत निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. धगधगती मशाल हे चिन्ह दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीचे आहे. १९९६ पासून हे चिन्ह समता पार्टीकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी दिल्ली हायकोर्टात समता पार्टीने ही याचिका केली होती. परंतु दिल्ली हायकोर्टाने ती याचिका फेटाळली त्यानंतर समता पार्टीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

मशाल चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. या सुनावणीत नेमके काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या प्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांचे म्हणणं मांडताना सांगितले की, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल हे चिन्ह दिले होते. पण ते अंतिम नाही. पोटनिवडणुकीनंतर चिन्हाचा पुर्नवाटपाबाबत विचार केला जाऊ शकतो असं उत्तर समता पार्टीला देण्यात आले होते. परंतु अद्याप काहीही निर्णय न झाल्याने समता पार्टीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

समता पार्टीचा दावा काय?

१९९६ पासून मशाल चिन्ह जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीकडे आहे. २००४ मध्ये समता पार्टीला मशाल चिन्ह देत ते नोंदणीकृत केले आहे असं समता पार्टी महाराष्ट्रने कळवलं. आमचा पक्ष १९९४ पासून राष्ट्रीयकृत पक्ष आहे. जनमाणसांत आमची प्रतिष्ठा आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्हाऐवजी दुसरं चिन्ह द्यावं अशी विनंती समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तृणेश अरुण देवळेकर यांनी निवडणूक आयोगाला केली होती. १९९४ मध्ये जॉर्ज फर्नांडिज, नितीश कुमार या नेत्यांनी मिळून लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात नवीन पक्ष निर्माण केला होता. ९९५ च्या विधानसभा निवडणुकीत समता पार्टीला ७ जागा मिळाल्या होत्या. तर १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत समता पार्टीने भाजपासोबत आघाडी केली होती. १९९६ मध्ये समता पार्टीने बिहारमध्ये ६, उत्तर प्रदेश आणि ओडिशात प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला होता. त्यानंतर १९९८ च्या निवडणुकीत १२ जागांवर विजय मिळवला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय