शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एकाच मंडपात १७ भाऊ-बहिणींचे लग्न,लग्नाची निमंत्रण पत्रिकाही एकच, कारण वाचून कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 06:25 IST

Marriage News: सामूहिक विवाहांमध्ये अनेक जोडपी लग्नगाठ बांधताना आपण पाहिली असतील, परंतु बिकानेरमधील एकाच कुटुंबातील तब्बल १७ चुलत भाऊ-बहिणींनी एकाच मंडपात लग्न केल्याने त्यांची चर्चा होत आहे.

बिकानेर : सामूहिक विवाहांमध्ये अनेक जोडपी लग्नगाठ बांधताना आपण पाहिली असतील, परंतु बिकानेरमधील एकाच कुटुंबातील तब्बल १७ चुलत भाऊ-बहिणींनी एकाच मंडपात लग्न केल्याने त्यांची चर्चा होत आहे.नोखा परिसरात मंगळवारी हे लग्न पार पडले. लग्नाच्या मिरवणुकीसह १२ वर मंडपात आल्यानंतर संपूर्ण गाव त्यांच्या स्वागतासाठी जमले. सोमवारी आणि मंगळवारच्या मध्यरात्री पाच चुलत भावंडांनी लग्नगाठ बांधली होती.

लग्नाची निमंत्रण पत्रिकाही एकचगावातील सुरजाराम गोदारा यांनी एकत्रित कुटुंबात काटकसरीचा आदर्श ठेवण्यासाठी आपल्या १७ नातवंडांचे एकत्र लग्न लावून दिले. यासाठी केवळ एकच लग्नाची निमंत्रण पत्रिका छापण्यात आली होती. यात पाच नातवंडे आयुष्मान आणि १२ नातवंडांना आयुष्मती असे लिहिले आहे. पाचही वरांची लग्नाची मिरवणूक एकाच वेळी निघाली. 

नातवंडांच्या लग्नासाठी येणाऱ्या लग्नाच्या मिरवणुकीच्या स्वागताचा कार्यक्रमही त्याचवेळी घेण्यात आला. मंगळवारी रात्री एकामागून एक १२ लग्नाच्या मिरवणुका गावात पोहोचल्या. सुरजाराम यांच्या घरी लग्नाचा मोठा मंडप घालण्यात आला होता. 

का केले एकत्र लग्न?आज दोन भावांमध्ये सतत खटके उडत असल्याचे पाहायला मिळते. मात्र सुरजाराम गोदारा यांची पाच मुले ओमप्रकाश, गोविंद, मनाराम, भगीरथ आणि भैराराम आजही एकत्र कुटुंब म्हणून राहतात. या पाच जणांना १७ मुले आहेत. यामध्ये पाच मुले आणि १२ मुली आहेत. प्रत्येकजण प्रौढ झाल्यावर स्वतंत्र विवाह न करता सामूहिक विवाह करून विवाहावरील खर्च कमी करण्याचा संदेश देत कुटुंब त्याच दिवशी विवाहसोहळे आयोजित करण्यात आला. 

टॅग्स :marriageलग्नFamilyपरिवारRajasthanराजस्थान