शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

Marriage : मुस्लीम 'निकाह' म्हणजे करार, हिंदू विवाहाप्रमाणे संस्कार नाही - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 23:46 IST

Marriage : बंगळुरूच्या एका कौटुंबिक न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रथम अतिरिक्त मुख्य न्यायाधीश यांच्या 12 ऑगस्ट 2011 च्या आदेशाला रद्द करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.

ठळक मुद्देरहमानची पहिली पत्नी सायरा बानोने 24 ऑगस्ट 2002 रोजी खटला दाखल केला. त्यावेळी, कौटुंबिक न्यायालयाने आदेश दिला होती की, प्रकरणाच्या तारखेपासून मृत्यूपर्यंत, किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा प्रतिवादीच्या मृत्यूपर्यंत 3 हजार रुपये मासिक भत्ता घेण्यास हकदार

बंगळुरू - कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाह आणि विवाह या दोन्हीमधील फरक स्पष्टपणे सांगितला आहे. भुवनेश्वर नगरात राहणाऱ्या एजाजूर रहमान यांच्यातर्फे दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. मुस्लीम निकाह एक करार आहे, ज्याचे अनेक अर्थ आहेत, ते हिंदू विवाहाप्रमाणे संस्कार नाहीत. त्यामुळे, निकाह तुटल्याने निर्माण झालेल्या अधिकार आणि दायित्वांपासून मागे हटता येत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.    

बंगळुरूच्या एका कौटुंबिक न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रथम अतिरिक्त मुख्य न्यायाधीश यांच्या 12 ऑगस्ट 2011 च्या आदेशाला रद्द करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. याचिकेनुसार रहमानने पत्नी सायरा बानोसोबत 5 हजार रुपयांत विवाह केला होता. मात्र, काही महिन्यांतच तलाक हा शब्द वापरुन 25 नोव्हेंबर 1991 रोजी ते विभक्त झाले. त्यानंतर, रहमानने दुसरे लग्न केले. त्यातून त्यास एक मुलगाही झाला. 

दरम्यान, रहमानची पहिली पत्नी सायरा बानोने 24 ऑगस्ट 2002 रोजी एक दिवानी खटला दाखल केला. त्यावेळी, कौटुंबिक न्यायालयाने आदेश दिला होती की, प्रकरणाच्या तारखेपासून मृत्यूपर्यंत, किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा प्रतिवादीच्या मृत्यूपर्यंत 3 हजार रुपये मासिक भत्ता घेण्यास हकदार आहे. मात्र, रहमानने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायाधीश कृष्णा एस. दीक्षित यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली. त्यामध्ये, मुस्लीम निकाह हा संस्कार नाही, त्यामुळेच या नात्याच्या समाप्तीनंतर बनलेल्या दायित्व आणि अधिकारांपासून तु्म्हाला पळ काढता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. तसेच, 25 हजार रुपयांच्या दंडासह ही याचिका रद्द करण्यात आली.  

टॅग्स :Courtन्यायालयHinduहिंदूtriple talaqतिहेरी तलाकmarriageलग्न