शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील ‘त्या’ प्रकल्पांवर भाजपचे गुजरातमध्ये मार्केटिंग!रोजगार निर्मितीसाठी देताहेत वेदांता-फॉक्सकॉनचे उदाहरण

By कमलेश वानखेडे | Updated: November 23, 2022 10:18 IST

राजकोटमध्ये विकास या मुद्द्यावर भाजपची पकड घट्ट झाल्याचे दिसून येते. पण त्या विकासाचे वाटेकरी होऊ शकलो नाही, अशी नाराजी तरुण उघडपणे बोलून दाखवितात. नेमका हाच मुद्दा काँग्रेसने हेरला आहे.

राजकोट : बेरोजगारीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुजरातेत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला असताना दुसरीकडे भाजपने महाराष्ट्रातून गुजरातमध्ये आणलेल्या उद्योगांचे मार्केटिंग सुरू केले आहे. भाजपचे प्रचारक, पदाधिकारी व कार्यकर्ते वेदांता-फॉक्सकॉनसह टाटा समूहाच्या एअरबस प्रकल्पामुळे कशी रोजगारनिर्मिती होणार आहे, हे युवकांना पटवून देण्याच्या कामी लागले आहेत.राजकोटमध्ये विकास या मुद्द्यावर भाजपची पकड घट्ट झाल्याचे दिसून येते. पण त्या विकासाचे वाटेकरी होऊ शकलो नाही, अशी नाराजी तरुण उघडपणे बोलून दाखवितात. नेमका हाच मुद्दा काँग्रेसने हेरला आहे. राहुल गांधी यांनी राजकोटच्या सभेत बेरोजगारी व बंद पडलेल्या छोट्या उद्योगांवर बोट ठेवत तरुणाईला साद घातली; तर आपनेही भाजपची नेमकी हीच दुखती नस दाबली आहे.

तरुण का आहेत नाराज?लोकमत प्रतिनिधीने राजकोटच्या युवकांशी चर्चा केली असता बहुसंख्य युवक बेरोजगारीच्या मुद्द्यावर नाराज असल्याचे दिसून आले.गेल्या काही वर्षांत शासकीय नोकरभरती झाली नाही. नोकरीसाठी अर्ज मागविले तर परीक्षा झाली नाही. परीक्षा घेतली तर पेपर फुटला. निकाल लागले तर मुलाखती झाल्या नाहीत. ज्यांच्या मुलाखती झाल्या त्यांना नियुक्तिपत्र मिळाले नाही.तलाठ्यांच्या तीन हजारांवर जागा निघाल्या होत्या. त्यासाठी तीन लाखांवर अर्ज आले होते. यावरून सुशिक्षित बेरोजगारांची संख्या किती वाढली आहे, अशी आकडेवारी युवकच मांडत आहेत. सौराष्ट्रच्या भागात गेल्या पाच वर्षांत मोठा उद्योग उभारण्यात आलेला नाही. किमान त्यावर तरी भाजपने लक्ष द्यायला हवे होते, अशी तरुणांची अपेक्षा आहे.

नावात गांधी आहे तर गांधींचा विचार समजा : सुधांशू त्रिवेदी- महात्मा गांधी यांनी स्वत:च्या वृत्तपत्रात वीर सावरकर यांच्यावर लेख लिहिला होता. त्यात त्यांनी सावरकरांबाबत बहादूर, चतुर व देशभक्त असा गौरव केला होता. त्यामुळे नावात गांधी असणाऱ्यांनी किमान गांधींनी लिहिलेले तरी वाचावे व त्यांचा विचार समजून घ्यावा, असा चिमटा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधी व तुषार गांधी यांना काढला.

- त्रिवेदी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोटला एम्स, आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले. सहापदरी महामार्गाने जोडले. सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण करून सौराष्ट्रची तहान भागवली. मात्र, २० वर्षे ज्यांनी तहानलेल्या गुजरातचे पाणी रोखून धरले, त्यांना सोबत घेऊन राहुल गांधी चालले. त्यामुळे आता गुजरातची जनताच काँग्रेसला ‘औकात’ दाखवेल, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाcongressकाँग्रेसEmployeeकर्मचारी