परतीचा पाऊस मराठवाड्याला पावला !

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:36+5:302015-09-07T23:27:36+5:30

Marathwada rain fall! | परतीचा पाऊस मराठवाड्याला पावला !

परतीचा पाऊस मराठवाड्याला पावला !

>जोरदार हजेरी : वीज पडून तीन ठार

औरंगाबाद : संपूर्ण हंगामात मराठवाड्यावर रुसलेला पाऊस अखेर परतीच्या वेळी पावला. औरंगाबाद वगळता विभागातील सर्व जिल्ह्यांत सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून सोमवारी ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडला. बीडमध्येही रिमझिम पावसाला रात्री आठनंतर सुरुवात झाली होती. आष्टी, अंबाजोगाई, सिरसाळा, माजलगाव व तालखेड परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. रविवारी झालेल्या पावसाची एकूण सरासरी ७.८ मिमी एवढी नोंद झाली आहे. जालना शहरातही रात्री उशिरा पावसाने हजेरी लावली.
नांदेड, कंधार, लोहा, अर्धापूर, बरबडा, उमरी परिसरातील मुगट, पाथरड, निवघा बाजार शिवारातही पाऊस झाला़ भोकर येथे एक तास विजेच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली़ हिंगोली तालुक्यातही सोमवारी पाऊस झाला. औंढा नागनाथ, हिंगोली, वसमत, कळमनुरी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. दोन महिन्यांच्या खंडानंतर परभणी, गंगाखेड या दोन तालुक्यांत पाऊस झाला़ गत तीन दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे़ (प्रतिनिधी)
---------------
वीज पडून वेगवेगळ्या घटनांत तीन जण ठार झाले. कंधारमधील बाचोटी येथे वीज पडून दिगांबर महाजन म्हैत्रे (२४) यांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात राहूल विश्वंभर जाधव (२५), कमल धनराज राठोड (३५) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तर प्रियंका राठोड (१४) ही मुलगी जखमी झाली.

Web Title: Marathwada rain fall!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.