शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अडचणी अनेक आल्या, पण त्यावर मात करत सरदार सरोवर उभे राहिले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 15:50 IST

सरदार सरोवराच्या उभारणीत अनेक अडचणी आल्या. मात्र या सर्व अडचणींवर मात करत सरदार सरोवर उभे राहिले, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले. सरदार सरोवर धरण पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते आज देशाला अर्पण करण्यात आले.

दभोई (गुजरात), दि. 17 -  सरदार सरोवराच्या उभारणीत अनेक अडचणी आल्या. मात्र या सर्व अडचणींवर मात करत सरदार सरोवर उभे राहिले, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले. सरदार सरोवर धरण पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते आज देशाला अर्पण करण्यात आले. दरम्यान, नर्मदा महोत्सवाच्या समारोप समारंभात बोलताना मोदींनी सरदार सरोवर हे बांधकामाचा अप्रतिम नमुना असून, हे सरोवर म्हणजे देशाला मिळालेली मोठी देणगी असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले, "विश्वकर्मा जयंतीदिवशी हे धरण देशाला अर्पण करणे म्हणजे या धरणाचे बांधकाम करणाऱ्यांचे स्मरण आहे. जर सरदार पटेल आणि डॉ. आंबेडकर जर काही वर्षे अधिक जीवित राहिले असते तर हे धरण 60 किंवा 70 च्या दशकातच बांधून पूर्ण झाले असते."यावेळी या धरणाच्या बांधकामामध्ये आलेल्या अडचणींचाही मोदींनी उल्लेख केला."या धरणाच्या बांधकामात अडथळे आणण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र या सर्व अडचणींवर मात करत धरण उभे राहिले,"असे मोदी म्हणाले. स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या आदिवासींच्या आठवणीही मोदींनी जागवल्या. ते म्हणाले,"काही लोकांना वाटते की केवळ मुठभर लोकांनीच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. मात्र आदिवासींच्या त्यागाचे विस्मरण झाले आहे."56 वर्षापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी भूमिपूजन केलेल्या सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. जगातील दुसरे आणि भारतातील सर्वांत मोठे धऱण ठरणार आहे. या लोकार्पणासाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रकल्पाचे भूमिपूजन १९६१ मध्ये झाले होते. मात्र, दप्तरदिरंगाई, विस्थापितांचा विरोध, न्यायालयीन लढा यामुळे प्रकल्प साठ वर्षे रेंगाळला होता.  दरवाजे बंद केल्यावर धरणाची उंची १३८ मी पर्यंत वाढली तसेच या धरणाची जलसाठा क्षमता ४.३ दशलक्ष क्युबिक मिटर्स इतकी झाली. पूर्वी धरणाची उंची १२१.९२ मी. इतकी होती.  या धरणाचा प्रत्येक दरवाजा ४५० टन वजनाचा असून तो बंद होण्यासाठी एका तासाचा अवधी लागतो. सरदार सरोवर हे त्यामध्ये वापरण्यात आलेल्या सर्वाधिक कॉक्रीटच्या वापरामुळेही चर्चेत आहे. सर्वात जास्त कॉक्रीट या धरणासाठी वापरले गेले आहे. अमेरिकेतील ग्रँड काऊली धरणानंतर सर्वात मोठे धरण म्हणून सरदार सरोवर प्रकल्पाचे नाव घेतले जाणार आहे. या धरणातून तयार झालेल्या विजेपैकी ५७ टक्के वीज महाराष्ट्र, २७ टक्के वीज मध्य प्रदेश तर ६ टक्के वीज गुजरात वापरणार आहे. १.२ किमी लांब या धरणावरील प्रकल्पाने आजवर ४१४१ कोटी युनीटची वीज निर्मिती केली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतGujaratगुजरातBJPभाजपा