शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अडचणी अनेक आल्या, पण त्यावर मात करत सरदार सरोवर उभे राहिले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 15:50 IST

सरदार सरोवराच्या उभारणीत अनेक अडचणी आल्या. मात्र या सर्व अडचणींवर मात करत सरदार सरोवर उभे राहिले, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले. सरदार सरोवर धरण पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते आज देशाला अर्पण करण्यात आले.

दभोई (गुजरात), दि. 17 -  सरदार सरोवराच्या उभारणीत अनेक अडचणी आल्या. मात्र या सर्व अडचणींवर मात करत सरदार सरोवर उभे राहिले, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले. सरदार सरोवर धरण पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते आज देशाला अर्पण करण्यात आले. दरम्यान, नर्मदा महोत्सवाच्या समारोप समारंभात बोलताना मोदींनी सरदार सरोवर हे बांधकामाचा अप्रतिम नमुना असून, हे सरोवर म्हणजे देशाला मिळालेली मोठी देणगी असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले, "विश्वकर्मा जयंतीदिवशी हे धरण देशाला अर्पण करणे म्हणजे या धरणाचे बांधकाम करणाऱ्यांचे स्मरण आहे. जर सरदार पटेल आणि डॉ. आंबेडकर जर काही वर्षे अधिक जीवित राहिले असते तर हे धरण 60 किंवा 70 च्या दशकातच बांधून पूर्ण झाले असते."यावेळी या धरणाच्या बांधकामामध्ये आलेल्या अडचणींचाही मोदींनी उल्लेख केला."या धरणाच्या बांधकामात अडथळे आणण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र या सर्व अडचणींवर मात करत धरण उभे राहिले,"असे मोदी म्हणाले. स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या आदिवासींच्या आठवणीही मोदींनी जागवल्या. ते म्हणाले,"काही लोकांना वाटते की केवळ मुठभर लोकांनीच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. मात्र आदिवासींच्या त्यागाचे विस्मरण झाले आहे."56 वर्षापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी भूमिपूजन केलेल्या सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. जगातील दुसरे आणि भारतातील सर्वांत मोठे धऱण ठरणार आहे. या लोकार्पणासाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रकल्पाचे भूमिपूजन १९६१ मध्ये झाले होते. मात्र, दप्तरदिरंगाई, विस्थापितांचा विरोध, न्यायालयीन लढा यामुळे प्रकल्प साठ वर्षे रेंगाळला होता.  दरवाजे बंद केल्यावर धरणाची उंची १३८ मी पर्यंत वाढली तसेच या धरणाची जलसाठा क्षमता ४.३ दशलक्ष क्युबिक मिटर्स इतकी झाली. पूर्वी धरणाची उंची १२१.९२ मी. इतकी होती.  या धरणाचा प्रत्येक दरवाजा ४५० टन वजनाचा असून तो बंद होण्यासाठी एका तासाचा अवधी लागतो. सरदार सरोवर हे त्यामध्ये वापरण्यात आलेल्या सर्वाधिक कॉक्रीटच्या वापरामुळेही चर्चेत आहे. सर्वात जास्त कॉक्रीट या धरणासाठी वापरले गेले आहे. अमेरिकेतील ग्रँड काऊली धरणानंतर सर्वात मोठे धरण म्हणून सरदार सरोवर प्रकल्पाचे नाव घेतले जाणार आहे. या धरणातून तयार झालेल्या विजेपैकी ५७ टक्के वीज महाराष्ट्र, २७ टक्के वीज मध्य प्रदेश तर ६ टक्के वीज गुजरात वापरणार आहे. १.२ किमी लांब या धरणावरील प्रकल्पाने आजवर ४१४१ कोटी युनीटची वीज निर्मिती केली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतGujaratगुजरातBJPभाजपा