शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

Mann Ki Baat : 'मन की बात' मधून रेडिओला 'डबल' फायदा; लोकप्रियतेसह झाली बक्कळ कमाई, तब्बल 30.80 कोटींचं उत्पन्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 08:45 IST

'Mann Ki Baat' radio programme generated over Rs 30.80 crore revenue : 'मन की बात' हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महिन्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे रेडिओची लोकप्रियता वाढली. याचा डबल फायदा झाला असून बक्कळ कमाई देखील केली आहे.

नवी दिल्ली - संवादाच्या नव्या माध्यमांमध्ये घुसमटत असलेल्या रेडिओला 'मन की बात' या कार्यक्रमाने (Mann Ki Baat) नवसंजीवनी दिली आहे. रेडिओसाठी हा प्रयोग एक वरदान ठरला आहे. 'मन की बात' हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) महिन्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे रेडिओची लोकप्रियता वाढली आहे. याचा डबल फायदा झाला असून बक्कळ कमाई देखील केली आहे. 2014 मध्ये 'मन की बात' हा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमामुळे 30.80 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. 2017-18 मध्ये सर्वाधिक कमाई ही 10.64 कोटी झाली. राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thaku ) यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

मन की बात या कार्यक्रमाचे प्रसारण हे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध चॅनलवर महिन्यातील शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता केलं जातं. प्रसार भारतीने आपल्या आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत मन की बात कार्यक्रमाच्या 78 एपिसोडचं प्रसारण केलं आहे. तसेच हा कार्यक्रम वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित केला जात असल्याची माहिती देखील ठाकूर यांनी दिली आहे. भाजपाचे खासदार राकेश सिन्हा यांनी यासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाने रेडिओची लोकप्रियता वाढली आहे का? आणि नवसंजीवनी मिळाली आहे का? प्रश्न करण्यात आला होता. 

अनुराग ठाकूर यांनी याला हो, असं उत्तर दिलं आहे. 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदी देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. हा एक अभिनव कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाद्वारे प्रत्येक नागरिकाला जोडला जातोय, सूचना मागवल्या जात आहेत आणि त्यांना शासनाचा एक भाग होण्याची संधीही दिली जात आहे असं ठाकूर म्हणाले. दूरदर्शनचे 34 चॅनेल्स आणि जवळपास 91 खासगी टीव्ही चॅनेल्सद्वारे संपूर्ण भारतात या कार्यक्रमाचे प्रसारण केले जात आहे. या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांची संख्या ही 11.8 कोटी इतकी आहे. या कार्यक्रमामुळे पारंपरिक रेडिओमध्ये नागरिकांची रुची वाढली असून जागरूकताही निर्माण झाली आहे, असं ठाकूर यांनी सांगितलं.

2017-18, 2018-19, 2019-20, 2020-21मध्ये आकाशवाणीला किती उत्पन्न मिळाले? असा प्रश्न करण्यात आला. याबद्दलही माहिती ठाकूर यांनी दिली आहे. ‘2017-18 मध्ये 10,64,27,300 कोटी रुपये, 2018-19 मध्ये 7,47,00,000 कोटी रुपये, 2019-20 मध्ये 2,56,00,000 कोटी रुपये आणि 2020-21 मध्ये 1,02,00,000 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. 2014 पासून ते आतापर्यंत 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीला 30.80 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. सर्वाधिक उत्पन्न हे 2017-18 मध्ये मिळाले. सर्वात कमी कमाई ही 2020-21 मध्ये झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा हेतू हा कमाईचा नाही तर सराकरच्या मुद्द्यांवर नागरिकांशी संवाद साधण्याचा आहे, असं अनुराग ठाकूर यांनी आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातIndiaभारत