शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

देशात मनमोहन सिंग यांच्या निधनाचा शोक, तर राहुल गांधी नववर्ष साजरं करण्यासाठी व्हिएतनाममध्ये? काँग्रेस-भाजपात आरोप प्रत्यारोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 17:59 IST

Rahul Gandhi News: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात शोकाचं वातावरण असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नववर्ष साजरं करण्यासाठी व्हिएतनामला गेले आहेत, असा दावा भाजपाच्या काही नेत्यांनी केला आहे. 

देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांचं नुकतंच निधन झालं. त्यानंतर देशात सात दिवसांच्या शासकीय राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली आहे. डॉ. सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या स्मारकावरून काँग्रेस आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपा आमने सामने आले आहेत. या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच राहुल गांधी हे परदेशात गेले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात शोकाचं वातावरण असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नववर्ष साजरं करण्यासाठी व्हिएतनामला गेले आहेत, असा दावा भाजपाच्या काही नेत्यांनी केला आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या सन्मानावरूक काँग्रेस आणि भाजपाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, मनमोहन सिंग यांच्या अस्थिविसर्जनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे बडे नेते अनुपस्थित राहिल्याचा आरोप भाजपाने केला होता. त्यावर काँग्रेसने डॉ. सिंग यांच्या गोपनीयतेचा हवाला देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थींचं शनिवारी दिल्लीतील यमुना नदीमध्ये विसर्जन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता भाजपाकडून काँग्रेस आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा लक्ष्य करण्यात आलं आहे. 

भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर हा नवा आरोप केला आहे. एकीकडे देश माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी हे नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी व्हिएतनामला रवाना झाले आहेत, असा दावा अमित मालवीय यांनी केला आहे. सोबतच राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधानांच्या निधनाचं राजकारण केल्याचा आरोपही अमित मालवीय यांनी केला. ते म्हणाले की गांधी आणि काँग्रेस शिखांचा द्वेष करतात.  इंदिरा गांधींनी दरबार साहिबला अपवित्र केलं होतं, हे विसरता कामा नये. 

दरम्यान, भाजपाने केलेल्या आरोपांना काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी हे परदेश दौऱ्यावर गेले आहेत. तसेच कुणाच्या खासगीपणाविषयी कुणाला काही अडचण असता कामा नये. काँग्रेसचे खासदार मणिक्कम टागोर यांनी सांगितले की, संघी लोक लक्ष विचलित करणारे हे राजकारण कधी बंद करणार? ज्याप्रकारे नरेंद्र मोदींनी यमुना नदीच्या किनाऱ्यावर डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. तसेच त्यांच्या मंत्र्यांनी डॉ. सिंग यांच्या कुटुंबीयांना ज्या प्रकारे घेरलं होतं, ते लाजिलवाणं होतं. जर राहुल गांधी हे त्यांच्या खासगी दौऱ्यावर जात असतील त्यामुळे तुम्हाला काय अडचण आहे? नव्या वर्षात तुमचं डोकं ठिकाणावर येवो, हीच शुभेच्छा, असा टोला त्यांनी लगावला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीManmohan Singhडॉ. मनमोहन सिंगcongressकाँग्रेसBJPभाजपा