शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था-समाज उद्ध्वस्त झाल्याचे परिणाम दिसताहेत - मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 16:01 IST

मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला आहे. अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करणाऱ्या या निर्णयाचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे आणि यामुळे देशातील प्रत्येक व्यक्ती प्रभावित झाला आहे. 

मनमोहन सिंग यांनी असंही म्हटलंय की, मोदी सरकारने आता असे कोणतेही पाऊल उचलू नये, ज्यामुळे अर्थव्यवस्थेसंदर्भात अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण होईल. मोदी सरकारने 2016 मध्ये अनेक त्रुटींसहीत तसंच गांभीर्याने विचार न करता नोटाबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे उद्ध्वस्त झालेली भारतीय अर्थव्यवस्थेसहीत समाजातही याचे परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत.  

(Note Ban Anniversary: मनमोहन म्हणे, नोटाबंदी हा अपशकुनी निर्णय, जेटलींचा पलटवार)

मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला संकुचित विचारांनी घेतलेला अपशकुनी निर्णय, असं संबोधलं आहे. नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेल्याचं आता समोर आलं आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य व्यक्ती प्रभावित झाल्या. मग ते कोणत्या धर्म, जाती किंवा पेशा, संप्रदायाचे असो. असं म्हणतात, एखादी जखम झाल्यास ती भरून निघते, परंतु नोटाबंदीमुळे झालेली जखम दिवसेंदिवस अजून खोलवर जाताना दिसत आहे. नोटाबंदीमुळे जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं समोर आलं आहे.

 

 

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीNote Banनोटाबंदी