शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना भारतरत्न द्या - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 09:19 IST

देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर चढणारे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना  भारतरत्न द्या अशी मागणी माजी केंद्रिय मंत्री तथा काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी केली आहे.

ठळक मुद्देभगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना  भारतरत्न द्या अशी मागणी काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी केली आहे.तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.चंदीगड विमानतळाचे नाव बदलून भगतसिंग विमानतळ करण्याची मागणीही तिवारी यांनी केली आहे.

नवी दिल्ली - देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर चढणारे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना भारतरत्न द्या अशी मागणी माजी केंद्रिय मंत्री तथा काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी केली आहे. यासाठी तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. भगतसिंग यांचे जन्मगाव आपल्या लोकसभा मतदारसंघात येते. त्यामुळे एक खासदार या नात्याने ही मागणी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी मी आपणास करत आहे असे तिवारी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

चंदीगड विमानतळाचे नाव बदलून भगतसिंग विमानतळ करण्याची मागणीही तिवारी यांनी केली आहे. भाजपा आणि रा. स्व. संघाने सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी सरकारवर दबाव वाढवलेला असतानाच काँग्रेसने भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवारी यांची मागणी मोदी सरकारने फेटाळल्यास राष्ट्रवादाच्या नावावर भाजपाच्या विरोधात काँग्रेसला मोठा मुद्दा मिळू शकतो. 

23 मार्च 1931 रोजी क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी लाहोर कारागृहात फाशी दिली होती. देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी या तिघांनीही क्रांतिकारी लढा दिला. हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे हे नायक प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आदर्शस्थानी आहेत. या तीन वीरांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यासाठी हे तिघंही जण हसत हसत मृत्यूला सामोरे गेले. शहीद झाले त्यावेळी भगत सिंग आणि सुखदेव हे 23 वर्षांचे आणि राजगुरू 22 वर्षांचे होते. भारत मातेची इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी, यासाठी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं.  

23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी जवळपास 7.33 वाजण्याच्या सुमारास भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली. फाशीपूर्वी भगत सिंग यांना अखेरची इच्छा विचारण्यात आली होती. त्यावेळी ते सिंग लेनीन यांचे आत्मचरित्र वाचत होते. वाचन पूर्ण करण्यासाठी सिंग यांनी कारागृह प्रशासनाकडे वेळ मागितला. यानंतर कारागृह अधिकाऱ्यांनी त्यांना फाशीची वेळ झाल्याचे सांगितले असता सिंग म्हणाले होते की, जरा थांबा. आधी एका क्रांतिकारकाला दुसऱ्या क्रांतिकारकाची भेट तरी घेऊ दे. यावेळी तिघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली. फासावर जाताना तिघंही 'मेरा रंग दे बसन्ती चोला, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसन्ती चोला, माय रंग दे बसन्ती चोला' हे देशभक्ती गीत गात होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसBhagat SinghभगतसिंगNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा