शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
4
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
5
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
6
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
7
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
8
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
9
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
10
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
11
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
13
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
14
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
15
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
16
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
17
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
18
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
20
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना भारतरत्न द्या - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 09:19 IST

देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर चढणारे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना  भारतरत्न द्या अशी मागणी माजी केंद्रिय मंत्री तथा काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी केली आहे.

ठळक मुद्देभगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना  भारतरत्न द्या अशी मागणी काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी केली आहे.तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.चंदीगड विमानतळाचे नाव बदलून भगतसिंग विमानतळ करण्याची मागणीही तिवारी यांनी केली आहे.

नवी दिल्ली - देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर चढणारे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना भारतरत्न द्या अशी मागणी माजी केंद्रिय मंत्री तथा काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी केली आहे. यासाठी तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. भगतसिंग यांचे जन्मगाव आपल्या लोकसभा मतदारसंघात येते. त्यामुळे एक खासदार या नात्याने ही मागणी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी मी आपणास करत आहे असे तिवारी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

चंदीगड विमानतळाचे नाव बदलून भगतसिंग विमानतळ करण्याची मागणीही तिवारी यांनी केली आहे. भाजपा आणि रा. स्व. संघाने सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी सरकारवर दबाव वाढवलेला असतानाच काँग्रेसने भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवारी यांची मागणी मोदी सरकारने फेटाळल्यास राष्ट्रवादाच्या नावावर भाजपाच्या विरोधात काँग्रेसला मोठा मुद्दा मिळू शकतो. 

23 मार्च 1931 रोजी क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी लाहोर कारागृहात फाशी दिली होती. देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी या तिघांनीही क्रांतिकारी लढा दिला. हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे हे नायक प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आदर्शस्थानी आहेत. या तीन वीरांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यासाठी हे तिघंही जण हसत हसत मृत्यूला सामोरे गेले. शहीद झाले त्यावेळी भगत सिंग आणि सुखदेव हे 23 वर्षांचे आणि राजगुरू 22 वर्षांचे होते. भारत मातेची इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी, यासाठी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं.  

23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी जवळपास 7.33 वाजण्याच्या सुमारास भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली. फाशीपूर्वी भगत सिंग यांना अखेरची इच्छा विचारण्यात आली होती. त्यावेळी ते सिंग लेनीन यांचे आत्मचरित्र वाचत होते. वाचन पूर्ण करण्यासाठी सिंग यांनी कारागृह प्रशासनाकडे वेळ मागितला. यानंतर कारागृह अधिकाऱ्यांनी त्यांना फाशीची वेळ झाल्याचे सांगितले असता सिंग म्हणाले होते की, जरा थांबा. आधी एका क्रांतिकारकाला दुसऱ्या क्रांतिकारकाची भेट तरी घेऊ दे. यावेळी तिघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली. फासावर जाताना तिघंही 'मेरा रंग दे बसन्ती चोला, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसन्ती चोला, माय रंग दे बसन्ती चोला' हे देशभक्ती गीत गात होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसBhagat SinghभगतसिंगNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा