शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

मोदी मणिपूर दौऱ्यावर का जात नाहीत? काँग्रेसच्या प्रश्नाला मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:45 IST

Manipur Violence News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरच्या दौऱ्यावर का जात नाहीत? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी विचारला होता. त्याला आता मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मागच्या दीड वर्षांपासून ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य जातीय संघर्षामध्ये होरपळत आहेत. या हिंसाचारात शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. दरम्यान, मणिपूरमधील या हिंसक संघर्षाबाबत दु:ख व्यक्त करत मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली होती. त्यानंतर काँग्रेसनेभाजपावर पलटवार केला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरच्या दौऱ्यावर का जात नाहीत? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी विचारला होता. त्याला आता मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी सोशल मीडियावर एक प्रदीर्घ पोस्ट लिहून राज्यातील सध्याच्या परिस्थितीचं खापत काँग्रेसवर फोडलं आहे. त्यांनी जयराम रमेश यांना प्रत्युत्तर देताना लिहिलं की, काँग्रेसने भूतकाळात ज्या काही चुका केल्या आहेत. त्यामुळे आज मणिपूर धुमसत आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. बर्मामधील आश्रितांचं मणिपूरमध्ये वारंवार होणारं पूनर्वसन, म्यानमारमध्ये असलेल्या उग्रवाद्यांसोबत २००८ मध्ये केलेला सस्पेंशन ऑफ ऑपरेशन करार, ही त्याची काही कारणं आहेत.  हा करारा केंद्र सरकार, मणिपूर सरकार आणि २५ कुकी सशस्त्र उग्रवादी समुहांसोबत झाला होता. त्यावेळी पी. चिदंबरम देशाचे गृहमंत्री होते. त्यानंतर दरवर्षी हा करार वाढवला जात आहे.

एन. बीरेन सिंह पुढे म्हणाले की, मी तुम्हाला हेही आठवून देऊ इच्छितो की, मणिपूरमध्ये नागा आणि कुकी जातीय संघर्षात सुमारे १३ हजार लोक मारले गेले. आणि हजारो लोक विस्तापित झाले. हा हिंसक संघर्ष १९९२ ते १९९७ पर्यंत सुरू होता. त्यातील सर्वाधिक हिंसाचार हा १९९२-१९९३ मध्ये झाला. ईशान्य भारतात तो काळ सर्वात भयानक जातीय संघर्षाचा होता. त्यामुळे नागा आणि कुकी समुदायातील संबंध बिघडले होते. तेव्हा १९९१ ते १९९६ या काळात पी. व्ही . नरसिंह राव हे पंतप्रधान होते. सोबतच ते काँग्रेसचे अध्यक्षही होते. ते या संघर्षाच्या काळात मणिपूरमध्ये आला होते का? त्यांनी माफी मागितली होती का? असा सवाल बीरेन सिंह यांनी विचारला.

ते पुढे म्हणाले की, राज्यात १९९७-१९९८ मध्ये कुकी-पाइते जातीय संघर्ष झाला होता. या संघर्षात ३५० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी इंद्रकुमार गुजराल हे पंतप्रधान होते. तेव्हा त्यांनी मणिपूरमध्ये येऊन लोकांची माफी मागितली होती का? मणिपूरच्या मूळ समस्या सोडवण्यापेक्षा काँग्रेस नेहमीच या मुद्द्यावर राजकारण का करते? असा सवालही त्यांनी विचारला. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस