शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

मोदी मणिपूर दौऱ्यावर का जात नाहीत? काँग्रेसच्या प्रश्नाला मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:45 IST

Manipur Violence News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरच्या दौऱ्यावर का जात नाहीत? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी विचारला होता. त्याला आता मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मागच्या दीड वर्षांपासून ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य जातीय संघर्षामध्ये होरपळत आहेत. या हिंसाचारात शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. दरम्यान, मणिपूरमधील या हिंसक संघर्षाबाबत दु:ख व्यक्त करत मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली होती. त्यानंतर काँग्रेसनेभाजपावर पलटवार केला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरच्या दौऱ्यावर का जात नाहीत? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी विचारला होता. त्याला आता मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी सोशल मीडियावर एक प्रदीर्घ पोस्ट लिहून राज्यातील सध्याच्या परिस्थितीचं खापत काँग्रेसवर फोडलं आहे. त्यांनी जयराम रमेश यांना प्रत्युत्तर देताना लिहिलं की, काँग्रेसने भूतकाळात ज्या काही चुका केल्या आहेत. त्यामुळे आज मणिपूर धुमसत आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. बर्मामधील आश्रितांचं मणिपूरमध्ये वारंवार होणारं पूनर्वसन, म्यानमारमध्ये असलेल्या उग्रवाद्यांसोबत २००८ मध्ये केलेला सस्पेंशन ऑफ ऑपरेशन करार, ही त्याची काही कारणं आहेत.  हा करारा केंद्र सरकार, मणिपूर सरकार आणि २५ कुकी सशस्त्र उग्रवादी समुहांसोबत झाला होता. त्यावेळी पी. चिदंबरम देशाचे गृहमंत्री होते. त्यानंतर दरवर्षी हा करार वाढवला जात आहे.

एन. बीरेन सिंह पुढे म्हणाले की, मी तुम्हाला हेही आठवून देऊ इच्छितो की, मणिपूरमध्ये नागा आणि कुकी जातीय संघर्षात सुमारे १३ हजार लोक मारले गेले. आणि हजारो लोक विस्तापित झाले. हा हिंसक संघर्ष १९९२ ते १९९७ पर्यंत सुरू होता. त्यातील सर्वाधिक हिंसाचार हा १९९२-१९९३ मध्ये झाला. ईशान्य भारतात तो काळ सर्वात भयानक जातीय संघर्षाचा होता. त्यामुळे नागा आणि कुकी समुदायातील संबंध बिघडले होते. तेव्हा १९९१ ते १९९६ या काळात पी. व्ही . नरसिंह राव हे पंतप्रधान होते. सोबतच ते काँग्रेसचे अध्यक्षही होते. ते या संघर्षाच्या काळात मणिपूरमध्ये आला होते का? त्यांनी माफी मागितली होती का? असा सवाल बीरेन सिंह यांनी विचारला.

ते पुढे म्हणाले की, राज्यात १९९७-१९९८ मध्ये कुकी-पाइते जातीय संघर्ष झाला होता. या संघर्षात ३५० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी इंद्रकुमार गुजराल हे पंतप्रधान होते. तेव्हा त्यांनी मणिपूरमध्ये येऊन लोकांची माफी मागितली होती का? मणिपूरच्या मूळ समस्या सोडवण्यापेक्षा काँग्रेस नेहमीच या मुद्द्यावर राजकारण का करते? असा सवालही त्यांनी विचारला. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस