शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

मोदी मणिपूर दौऱ्यावर का जात नाहीत? काँग्रेसच्या प्रश्नाला मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:45 IST

Manipur Violence News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरच्या दौऱ्यावर का जात नाहीत? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी विचारला होता. त्याला आता मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मागच्या दीड वर्षांपासून ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य जातीय संघर्षामध्ये होरपळत आहेत. या हिंसाचारात शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. दरम्यान, मणिपूरमधील या हिंसक संघर्षाबाबत दु:ख व्यक्त करत मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली होती. त्यानंतर काँग्रेसनेभाजपावर पलटवार केला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरच्या दौऱ्यावर का जात नाहीत? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी विचारला होता. त्याला आता मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी सोशल मीडियावर एक प्रदीर्घ पोस्ट लिहून राज्यातील सध्याच्या परिस्थितीचं खापत काँग्रेसवर फोडलं आहे. त्यांनी जयराम रमेश यांना प्रत्युत्तर देताना लिहिलं की, काँग्रेसने भूतकाळात ज्या काही चुका केल्या आहेत. त्यामुळे आज मणिपूर धुमसत आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. बर्मामधील आश्रितांचं मणिपूरमध्ये वारंवार होणारं पूनर्वसन, म्यानमारमध्ये असलेल्या उग्रवाद्यांसोबत २००८ मध्ये केलेला सस्पेंशन ऑफ ऑपरेशन करार, ही त्याची काही कारणं आहेत.  हा करारा केंद्र सरकार, मणिपूर सरकार आणि २५ कुकी सशस्त्र उग्रवादी समुहांसोबत झाला होता. त्यावेळी पी. चिदंबरम देशाचे गृहमंत्री होते. त्यानंतर दरवर्षी हा करार वाढवला जात आहे.

एन. बीरेन सिंह पुढे म्हणाले की, मी तुम्हाला हेही आठवून देऊ इच्छितो की, मणिपूरमध्ये नागा आणि कुकी जातीय संघर्षात सुमारे १३ हजार लोक मारले गेले. आणि हजारो लोक विस्तापित झाले. हा हिंसक संघर्ष १९९२ ते १९९७ पर्यंत सुरू होता. त्यातील सर्वाधिक हिंसाचार हा १९९२-१९९३ मध्ये झाला. ईशान्य भारतात तो काळ सर्वात भयानक जातीय संघर्षाचा होता. त्यामुळे नागा आणि कुकी समुदायातील संबंध बिघडले होते. तेव्हा १९९१ ते १९९६ या काळात पी. व्ही . नरसिंह राव हे पंतप्रधान होते. सोबतच ते काँग्रेसचे अध्यक्षही होते. ते या संघर्षाच्या काळात मणिपूरमध्ये आला होते का? त्यांनी माफी मागितली होती का? असा सवाल बीरेन सिंह यांनी विचारला.

ते पुढे म्हणाले की, राज्यात १९९७-१९९८ मध्ये कुकी-पाइते जातीय संघर्ष झाला होता. या संघर्षात ३५० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी इंद्रकुमार गुजराल हे पंतप्रधान होते. तेव्हा त्यांनी मणिपूरमध्ये येऊन लोकांची माफी मागितली होती का? मणिपूरच्या मूळ समस्या सोडवण्यापेक्षा काँग्रेस नेहमीच या मुद्द्यावर राजकारण का करते? असा सवालही त्यांनी विचारला. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस