शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 08:53 IST

Manipur Violence : पोलिस प्रशासनाने लोकप्रतिनधींच्या संपत्तीचे नुकसान करणाऱ्या व त्यांच्या घरांना आग लावणाऱ्या ७ जणांना अटक केली आहे.

Manipur Violence News इम्फाळ : जमावाच्या हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी मणिपूरचे अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याचे मंत्री एल. सुसिंद्रो मैतेई यांनी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील आपल्या वडिलोपार्जित घराला काटेरी कुंपण घातले आहे. त्या घरावर १६ नोव्हेंबर रोजी जमावाने हल्ला केला होता. माझ्या घरावर हल्ला करणाऱ्या लोकांवर तिथे तैनात सुरक्षा दलांच्या जवानांनी आम्ही दिलेल्या सूचनेनुसार गोळीबार केला नाही. मात्र जर पुन्हा असा हल्ला झाला तर आम्हाला स्वत:ची मालमत्ता, जीव यांचे रक्षण करण्याचा घटनात्मक अधिकार आहे, असा सूचनावजा इशारा मैतेई यांनी दिला. 

दरम्यान, पोलिस प्रशासनाने लोकप्रतिनधींच्या संपत्तीचे नुकसान करणाऱ्या व त्यांच्या घरांना आग लावणाऱ्या ७ जणांना अटक केली आहे. हल्लेखोरांची ओळख पटविण्यात आली आहे, असे त्या राज्याचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी शुक्रवारी सांगितले. १६ नोव्हेंबर रोजी हे हल्ले झाले होते.

नऊ जणांच्या मृतदेहांवर झाले अंतिम संस्कार

जिरिबाम जिल्ह्यात मैतेई जमातीतील तीन महिला, तीन लहान मुले यांच्यासह नऊ जणांच्या मृतदेहांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शुक्रवारी अंतिम संस्कार करण्यात आले. आसामच्या कचर जिल्ह्यातील सिलचर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात या मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली होती. 

‘हे काँग्रेसच्या अपयशाचे परिणाम’

काँग्रेसच्या अपयशाचे परिणाम आजही मणिपूरमध्ये जाणवत असल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी केला. 

मणिपूरच्या हिंसाचाराबाबत चुकीचा, खोटा व राजकीय हेतूने प्रेरित चर्चा घडवल्या जात असल्याचा आरोप करत या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती नड्डा यांनी राष्ट्रपतींकडे केली.

मणिपूरमध्ये काँग्रेसचे सरकार असताना स्थानिक समस्या सोडवण्यात त्यांना अपयश आले. त्याचे दुष्परिणाम आज भोगावे लागत आहेत.  

नड्डांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न : काँग्रेस

भाजप अध्यक्ष नड्डांनी काँग्रेस अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात केलेले आरोप पूर्णपणे खोटे असून मणिपूरच्या मुद्यावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात आलेले अपयशाची जबाबदारी केंद्र सरकार कधी घेणार? असा सवाल करीत काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी नड्डांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपाManipur People's Partyमणिपूर पीपल्स पार्टीcongressकाँग्रेस