शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

पोलिसांनीच आम्हाला जमावाच्या हवाली केले; मणिपूर घटनेतील पीडितेची आपबीती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 16:32 IST

मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढल्याच्या घटनेमुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होतोय.

Manipur Incident: दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची घटना मणिपूरमध्ये घडली. या घटनेनंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, आता घटेनेतील पीडित महिलांनी त्यांच्यासोबत झालेल्या क्रूरतेची भयावह कहाणी सांगितली आहे. पीडितांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणावर जातीने लक्ष घालत असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

काय म्हणाल्या पीडित महिलामीडिया रिपोर्टनुसार, 18 मे रोजी पीडित महिलांच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये एका महिलेवर क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे सांगितले होते. कांगपोकपी गावात झालेल्या हल्ल्यानंतर ते सर्व जंगलात पळून गेले, तिथून थौबल पोलिसांनी त्यांची सुटका करुन पोलिस ठाण्यात आणले. 

तीन महिला, सर्वात छोटीवर अत्याचारपीडित महिलांचे वय सुमारे 20 आणि 40 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस फिर्यादीत पीडित महिलांनी सांगिले की, आम्ही 5 जण होतो. दोन पुरुष आणि तीन महिला. आणखी एका 50 वर्षीय महिलेचेही जबरदस्तीने कपडे काढण्यात आल्याची माहिती आहे. जमावाने तीन महिलांपैकी सर्वात लहान महिलेच्या वडील आणि भावाची हत्या केल्याचा आरोप आहे.

पोलिसही त्यांच्यात सामील होतेमीडिया रिपोर्टनुसार, 20 वर्षीय अत्याचारीत पीडितेने सांगितले की, आमच्या गावावर हल्ला करणाऱ्या जमावासोबत पोलिसही होते. पोलिसांनी आम्हाला आमच्या घराजवळून उचललं आणि गावापासून थोडं दूर नेऊन गर्दीत सोडले. पोलिसांनी आम्हाला त्यांच्या ताब्यात दिले होते.

सर्व पुरुषांना मारलंरिपोर्टनुसार, पीडितेचे म्हणणे आहे की, सर्व पुरुषांना मारल्यानंतर जमावाने त्यांच्यावर अत्याचार केला. तिने सांगितले की, या घटनेचा व्हिडिओ काढल्याचे कुटुंबातील कोणालाही माहीत नव्हते. जमावापैकी अनेकजण पीडितेच्या ओळखीचे आहेत. त्यापैकी एक तिच्याच भावाचा मित्र असल्याचे तिने सांगितले. आता या प्रकरणाची चौकशी होणार असून, लवकरच सत्य बाहेर येईल.

आतापर्यंत काय कारवाई झाली?पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनीही याला दुजोरा दिला आहे. खुरियम हिरो दास असे आरोपीचे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरमधील घटनेचा उल्लेख केला. पीएम मोदींनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मणिपूरमधील घटनेची स्वतःहून दखल घेतली आणि राज्य आणि केंद्र सरकारला या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस