शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'INDIA' आघाडीचा मणिपूर दौरा; 29-30 जुलै रोजी खासदार हिंसाचारग्रस्त भागात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 17:57 IST

Manipur Violence: मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गाजत आहे.

Manipur Violence: मणिपूर हिंसाचारावरुन संसदेच्या पावसाळी अधिवशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गदारोळ सुरू आहे. अधिनेशनाच्या पहिल्या दिवसापासून संसदेत सुरू असलेल्या गदारोळानंतर आता विरोधी पक्षांनी नवी रणनीती आखली आहे. 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स' (INDIA) विरोधी आघाडीतील खासदारांचे शिष्टमंडळ मणिपूरला दौऱ्यावर जाणार आहे. 29 आणि 30 जुलै रोजी हे शिष्टमंडळ हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकसभेतील काँग्रेसचे व्हिप मणिकम टागोर यांनी सांगितले की, विरोधी पक्षांच्या 20 हून अधिक खासदारांचे शिष्टमंडळ या आठवड्याच्या शेवटी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मणिपूरला भेट देणार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच मणिपूरचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागात राहणाऱ्या लोकांची भेट घेतली होती. मात्र, राहुल गांधींच्या मणिपूर दौऱ्यावरून बराच वाद झाला होता.

विरोधी पक्षांची संसदेत मागणीसर्व विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवर संसदेत चर्चा करण्याची मागणी करत आहेत. मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर संसदेत सुरू असलेल्या गदारोळादरम्यान काँग्रेसने लोकसभेत सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला, जो सभागृहात चर्चेसाठी मंजूर करण्यात आला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून या प्रस्तावावर चर्चेची तारीख ठरवतील. पंतप्रधान मोदींना मणिपूरवर वक्तव्य करण्यास भाग पाडण्याचा हा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा