शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

मणिपूरमध्ये मोठा अतिरेकी हल्ला, आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरचा पत्नी आणि मुलासह मृत्यू, चार जवानांना हौतात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 17:10 IST

Manipur News: ४६ Assam Riflesचे कमांडिंग ऑफिसर त्यांचे कुटुंबीय आणि क्यूआरटीसोबत जात असताना अतिरेक्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कमांडिंग अधिकारी कर्नल Viplav Tripathi पत्नी आणि मुलासह मृत्यू झाला. तर क्यूआरटीमध्ये तैनात असलेल्या चार जवानांना वीरमरण आले.

इंफाळ - मणिपूरमध्ये आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबावर अतिरेक्यांनी दबा धरून भ्याड हल्ला केला. हा हल्ला शनिवारी सकाळी १० वाजता शेखन-बेहिआंग पोलिस स्थानक परिसरामध्ये झाला. मिळालेल्या माहितीनुसार ४६ आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर त्यांचे कुटुंबीय आणि क्यूआरटीसोबत जात असताना अतिरेक्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कमांडिंग अधिकारी कर्नल विप्लव त्रिपाठी त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. तर क्यूआरटीमध्ये तैनात असलेल्या चार जवानांना  वीरमरण आले. (Terror Attack on 46 Assam Rifles Commanding officer)

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. हे अमानवीय आणि दहशतवादी क्रृत्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अशा प्रकारचे भ्याड कृत्य करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. असा इशारा दिला आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, क्विक रिअॅक्शन टीमसोबत अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यही या ताफ्यामध्ये होते. दरम्यान, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांबाबत अध्याप पूर्ण माहिती समोर आलेली नाही, आता याबाबतची अधिक माहिती घेतली जात आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानAssamआसामTerror Attackदहशतवादी हल्ला