शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये; काँग्रेसने दिले कारवाईचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 06:07 IST

मोदी यांनी जवानांचा बळी दिल्याचाही आरोप अय्यर यांनी केला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन वर्षांपूर्वी ‘नीच’ असा उल्लेख केल्याने वादात सापडलेले कॉँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी आपले विधान योग्यच होते, असा दावा एका लेखात केला आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मणिशंकर अय्यर यांना वरील विधानामुळे काँग्रेसने निलंबित केले होते. पुढे २0१८ मध्ये त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यानंतर आता अय्यर यांनी मोदी यांचा उल्लेख देशाने पाहिलेला अत्यंत शिवराळ पंतप्रधान असा केला आहे.

अय्यर यांचे तेव्हाचे विधान आम्हाला अमान्य होते. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई केली होती. ते त्या विधानाचे समर्थन करीत असले तरी आम्हाला ते मान्य नाही. अशी भाषा व टीका ही आमची संस्कृती नाही, त्यांच्यावर योग्य वेळी कारवाई केली जाईल, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. जनता २३ मे रोजी सत्तेतून बाहेर घालवेल, देशाने पाहिलेल्या शिवराळ पंतप्रधानाची तो अखरेचा दिवस असेल. ते सभ्य नाहीत. मी मोदी यांना ७ डिसेंबर २०१७ मध्ये काय म्हटले होते, आठवते का? मी योग्य भविष्यवाणी केली नव्हती? या पद्धतीचे घाणेरडे राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही, असे अय्यर यांनी म्हटले आहे. मोदी यांनी जवानांचा बळी दिल्याचाही आरोप अय्यर यांनी केला आहे. राजीव गांधी यांच्याविषयीच्या मोदींच्या विधानामुळे अय्यर यांनी वरील वक्तव्य केले आहे.

...हा तर दुटप्पीपणाभाजपचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी अय्यर यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, त्यांनी आपले पूर्वीचे विधान योग्य ठरविण्यासाठी खटाटोप केला. त्यांनी माफी मागितली होती. त्यांच्या पक्षानेही त्यांना निलंबित केले. असे वक्तव्य आपले हिंदी वाईट असल्याने उद्गारले गेले, असे म्हटले होते. आता मात्र आपण योग्य भविष्यवाणी केल्याचे ते सांगत आहेत. कॉँग्रेसने त्यांना गेल्याच वर्षी पक्षात घेतले. कॉँग्रेसचा दुटप्पीपणा यातून दिसून येतो.

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यरcongressकाँग्रेसBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक