शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये; काँग्रेसने दिले कारवाईचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 06:07 IST

मोदी यांनी जवानांचा बळी दिल्याचाही आरोप अय्यर यांनी केला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन वर्षांपूर्वी ‘नीच’ असा उल्लेख केल्याने वादात सापडलेले कॉँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी आपले विधान योग्यच होते, असा दावा एका लेखात केला आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मणिशंकर अय्यर यांना वरील विधानामुळे काँग्रेसने निलंबित केले होते. पुढे २0१८ मध्ये त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यानंतर आता अय्यर यांनी मोदी यांचा उल्लेख देशाने पाहिलेला अत्यंत शिवराळ पंतप्रधान असा केला आहे.

अय्यर यांचे तेव्हाचे विधान आम्हाला अमान्य होते. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई केली होती. ते त्या विधानाचे समर्थन करीत असले तरी आम्हाला ते मान्य नाही. अशी भाषा व टीका ही आमची संस्कृती नाही, त्यांच्यावर योग्य वेळी कारवाई केली जाईल, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. जनता २३ मे रोजी सत्तेतून बाहेर घालवेल, देशाने पाहिलेल्या शिवराळ पंतप्रधानाची तो अखरेचा दिवस असेल. ते सभ्य नाहीत. मी मोदी यांना ७ डिसेंबर २०१७ मध्ये काय म्हटले होते, आठवते का? मी योग्य भविष्यवाणी केली नव्हती? या पद्धतीचे घाणेरडे राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही, असे अय्यर यांनी म्हटले आहे. मोदी यांनी जवानांचा बळी दिल्याचाही आरोप अय्यर यांनी केला आहे. राजीव गांधी यांच्याविषयीच्या मोदींच्या विधानामुळे अय्यर यांनी वरील वक्तव्य केले आहे.

...हा तर दुटप्पीपणाभाजपचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी अय्यर यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, त्यांनी आपले पूर्वीचे विधान योग्य ठरविण्यासाठी खटाटोप केला. त्यांनी माफी मागितली होती. त्यांच्या पक्षानेही त्यांना निलंबित केले. असे वक्तव्य आपले हिंदी वाईट असल्याने उद्गारले गेले, असे म्हटले होते. आता मात्र आपण योग्य भविष्यवाणी केल्याचे ते सांगत आहेत. कॉँग्रेसने त्यांना गेल्याच वर्षी पक्षात घेतले. कॉँग्रेसचा दुटप्पीपणा यातून दिसून येतो.

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यरcongressकाँग्रेसBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक