शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण न झाल्याने 'त्यानी' मुलींचं नाव ठेवलं 'अनचाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 9:03 AM

मुलगा न झाल्याने त्यांनी दोन मुलींची नाव 'अनचाही' (नको असलेली) असं ठेवलं आहे.

मंदसौर- जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 35 किलोमीटर लांब असणाऱ्या बिल्लौर गावातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथिल दोन दाम्पत्याला मुलगा न झाल्याने त्यांनी झालेल्या मुलींची नाव 'अनचाही' असं ठेवलं आहे. विशेष म्हणजे मुलगा व्हावा यासाठी नवस, उपवास असं सगळं या दोन्ही दाम्पत्याने केलं. पण तरिही मुलगा न झाल्याने त्यांनी दोन मुलींची नाव 'अनचाही' (नको असलेली) असं ठेवलं आहे. या दोन्ही मुलींची नावं जन्माचा दाखला, आधारकार्ड व शाळेतही तेच ठेवण्यात आलं आहे. मध्य प्रदेशात मुलींच्या जन्मासाठी सकारात्मक दृष्टीकोनाचा प्रसार व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसंच मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी लाडली लक्ष्मी योजना सारख्या विविध योजना सुरू असतानाही अशा प्रकारच्या घटना समोर येत आहे. या दोन मुलींपैकी एक मुलगी मंदसौर कॉलेजमध्ये बीएससीच्या प्रथम वर्षात शिकते आहे. 

बीएससीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या 'अनचाही'ची आई कांताबाई यांनी सांगितलं की, आम्ही मुलगा व्हावा यासाठी नवसं केला होता. पण तरिही पाचवं अपत्य मुलगीच झाली. पाचवीही मुलगी झाल्याने आमचं मुलगा व्हावा, ही इच्छा पूर्ण झाली नाही. म्हणूनच आम्ही मुलीचं नाव 'अनचाही' ठेवलं. या मुलीनंतर तरी मुलगा होईल असं आम्हाला वाटलं होतं. पण पुन्हा मुलगीच झाली, पण दीड वर्षानंतर तिचा मृत्यू झाला. यानंतर आम्ही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली. याच गावातील आणखी एक परिवार आहे ज्यांचीही पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण झाली नाही. मुलासाठी नवस बोलूनही मुलगा झाला नाही. तीनही मुलींचा जन्म झाला. म्हणून या कुटुंबानेही शेवटच्या मुलीचं नाव अनचाही ठेवलं. ही मुलगी सहावीत शिकते आहे. 

बीएससीच्या पहिल्या वर्षात शिकत असणाऱ्या मुलीला तिचं नाव बदलून घ्यायचं आहे. शाळा, कॉलेजमधील तिच्या इतर मित्र-मैत्रिणींना तिच्या नावाचा अर्थ समजल्यावर त्यांनी तिची मस्करी केली. त्यामुळे नाव बदलून घेण्याची तिची इच्छा आहे. दहावी परीक्षेचा फॉर्म भरताना या मुलीने नाव बदलण्याचा प्रयत्न केला. पण शाळा प्रशासनाने नाव बदलता येणार नसल्याचं सांगितलं. पण तरिही पुढे नाव बदलून  मिळावं यासाठी ती प्रयत्न करते आहे. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश