शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

नांदा सौख्यभरे! तब्बल 10 वर्षे गर्लफ्रेंडला एका खोलीत ठेवलं लपवून; आता बांधली लगीनगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 17:57 IST

man marriage his girlfriend hide her in room for 10 years : एका प्रियकराने कोणालाही भनक न लागता त्याच्या प्रेयसीला तब्बल दहा वर्ष एकाच रुममध्ये लपवून ठेवलं.

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. एका प्रियकराने कोणालाही भनक न लागता त्याच्या प्रेयसीला तब्बल दहा वर्ष एकाच रुममध्ये लपवून ठेवलं. आश्चर्य म्हणजे त्याच्या घरातील सदस्यांनाही त्यांच्या घरात 10 वर्षापासून एक अज्ञात युवती राहतेय त्याची कल्पना नव्हती. त्यानंतर आता या दोघांनी कायदेशीर लग्न केल्याची घटना समोर आली आहे. 

या अजब प्रेमाची सुरूवात फेब्रुवारी 2010 मध्ये झाली तेव्हा 18 वर्षीय सजिथा नावाची एक मुलगी अचानक घरातून गायब झाली. सजिथा केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील आईलूर येथील तिच्या राहत्या घरातून गायब झाली होती. नातेवाईकाकडे जाण्याच्या बहाण्याने ती घरातून बाहेर पडली ती कधीच परतली नाही. ना ती नातेवाईकांच्या घरी गेली ना स्वत:च्या घरी आली. घरातून बाहेर गेलेली सजिथा बेपत्ता झाली. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर जेव्हा सजिथा घरी परतली नाही तेव्हा तिच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला परंतु सजिथा ठावठिकाणा लावण्यास त्यांनाही अपयश आलं.

"आम्ही गेल्या दहा वर्षांपासून एकत्र राहत आहोत"

सजिथा तिच्याच गावातील 24 वर्षीय मुलावर प्रेम करत होती. रेहमान आणि सजिथा एकाच गावात राहत होते. त्यांच्या या प्रेमाची कुटुंबाला, मित्रांना आणि नातेवाईकांना काहीच माहिती नव्हती. याच गोष्टीचा फायदा घेत दोघांनीही हा प्लॅन बनवला. दहा वर्ष कोणालाही भनक न लागता ते दोघंही एकाच छताखाली राहत होते. जेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा रेहमान विरोधात तक्रार करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी दोघांना कोर्टात हजर केलं. यावेळी त्यांनी सांगितलं की, आम्ही गेल्या दहा वर्षांपासून एकत्र राहत आहोत. आणि भविष्यातही एकत्र राहण्याची इच्छा आहे. कोर्टाने त्यांना एकत्र राहण्याची परवानगीदेखील दिली आहे. 

पलक्कड जिल्ह्यातील नेनमारामध्ये केलं लग्न

जेव्हा रेहमानच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती झाली तेव्हा काही जण खूप खूश झाले तर अनेकांना हे आवडलं नाही. मात्र यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी पलक्कड जिल्ह्यातील नेनमारामध्ये कायदेशीर लग्न केलं. यावेळी सजिथाचे आई-वडील लग्नात सामील झाले. मात्र रेहमानचे काही नातेवाईक नाखूश असल्याने ते या लग्नाला आले नाहीत. यावेळी लग्नात रेहमान आणि सजिथाने  मिठाई देखील वाटली आणि लग्नात आल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच रेहमानने आम्हाला सुखी जीवन जगायचं असल्याचं सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :KeralaकेरळIndiaभारतmarriageलग्न